धारूर : कार व दुचाकीच्या अपघातात एक ठार, तर एक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे आरणवाडीजवळील घाटात घडली. तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच असून, प्रवाशांत मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
किल्ले धारूर घाटामध्ये राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी वर शुक्रवारी सकाळी सहाच्यासुमारास कार व दुचाकीचा अपघात झाला. कार (क्र. एमएच २० एफ. पी. ४१३२) ही औरंगाबाद येथून लातूरकडे जात होती. तेलगावकडे जाणाऱ्या दुचाकीला कार धडकली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जखमी झाला. मृताचे नाव शैलेश पवार (रा. औरंगाबाद) असल्याचे कळते. या अपघातातील जखमीला किल्ले धारूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. यात एक वर्षाच्या रुद्र या बालकासह प्रवीण कातळे, महारुद्र कातळे या दोघांचा समावेश होता. यातील प्रवीण यास गंभीर मार लागल्याने अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये हलवण्यात आले आहे.
वाहतूक, घाटातील वळणे अपघाताचे कारण
गुरुवारी तेलगाव येथे बीड-परळी रस्त्यावर एका महिलेस ट्रकने चिरडल्याची घटना घडली होती. तर अंबेवडगाव येथे ४ मार्च रोजी पहाटे कार व ट्रॅक्टरचा अपघात होऊन एक तरुण ठार झाल्याची घटना घडली होती. राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी वर वाढती वाहतूक व घाटातील अवघड वळणे अपघाताचे कारण ठरत आहे. येथील घाट रुंदीकरणाचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याने घाटात तासनतास वाहतूक खोळंबत असल्याचे दिसत आहे.
===Photopath===
120321\anil mhajan_img-20210312-wa0039_14.jpg
===Caption===
धारूर घाटात शुक्रवारी झालेल्या कार- दुचाकी अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली.