शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही
2
भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात; पक्षाच्या खासदारांनीच मागितला राजीनामा
3
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
4
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
5
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
6
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
7
काळवीटाच्या शिकारीनंतर सलमानने बिश्नोई समाजाला दिलेली पैशांची ऑफर? लॉरेन्सच्या भावाचा मोठा खुलासा, म्हणाला...
8
Stock Market Opening: शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टीची संमिश्र सुरुवात; हिंदाल्को, HUL मध्ये मोठी घसरण
9
Diwali 2024 लक्ष्मी पूजन ३१ ऑक्टोबर की ०१ नोव्हेंबरला? तारखेबाबत संभ्रम; पाहा, शुभ मुहूर्त
10
Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?
11
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
12
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
13
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
14
बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट जूनमध्ये शिजला होता; अकराव्या आरोपाली ठोकल्या बेड्या
15
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
16
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
17
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
18
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
19
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
20
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!

पोस्ट करणारे तर सोडाच पण कमेंट्स अन् ॲडमिनवरही होणार कारवाई

By सोमनाथ खताळ | Published: June 07, 2024 12:06 PM

सोशल मीडियावर अफवा पसरवू नका : नंदकुमार ठाकूर यांचा इशारा

सोमनाथ खताळ, बीड : लोकसभा निवडणूक मतमोजणी निकालानंतर सोशल मीडियावर वादावादी सुरू झाली आहे. वादग्रस्त पोस्ट केल्याने दोन समाजांत, गटांत हाणामाऱ्या, दगडफेक अशा घटना घडत आहेत. याच अनुषंगाने पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत शांतता ठेवण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवर तर कारवाई होणारच आहे, शिवाय त्याखाली कमेंट्स करणारे आणि ग्रुप ॲडमिनवरही कडक कारवाई करण्याचा इशारा ठाकूर यांनी दिला आहे.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत यावेळी जातीय राजकारण झाले. मतमोजणीनंतर याचे पडसाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी उमटले. त्यानंतर पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेत आवाहन केले. त्यामुळे काही दिवस शांतता राहिली. परंतु आता पुन्हा एकदा मतमोजणीनंतर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याने तणाव निर्माण होत आहे. यासंदर्भात सायबर पोलिसांनी नजर ठेवून वादग्रस्त पोस्ट हटवल्या, शिवाय कारवायाही केल्या आहेत. परंतु लोकांनी हार-जीत मान्य करून शांतता ठेवावी. वादग्रस्त पोस्ट करू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. जर कोणी अशा प्रकारच्या पोस्ट करतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

यावेळी अपर अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक देविदास गात, उपनिरीक्षक शैलेष जोगदंड, निशिगंधा खुळे, स्वाती लहाने यांच्यासह सर्व सायबर टीम उपस्थित होती.

५५० पोस्ट हटवल्या

सायबर पोलिसांना ६०० पेक्षा अधिक वादग्रस्त पाेस्ट आढळून आल्या. त्यातील ५५० पोस्ट हटविण्यात आल्या आहेत. तसेच ३५० लोकांवर आतापर्यंत कारवाई केल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.

१५ दिवसांत २८ गुन्हे

व्हाॅट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी समाज माध्यमांवर वादग्रस्त पाेस्ट केल्याने पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. गुरुवारपर्यंत हा आकडा २८ वर पोहोचला होता. यातील २४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सुशिक्षित लोकांकडूनच वादग्रस्त पोस्ट

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणारे हे सर्वात जास्त सुशिक्षितच आहेत. यामध्ये पत्रकार, वकील, इंजिनिअर आदींचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी अफवा पसरवलेल्या वकिलाला न्यायालयाने दोन दिवसांची पाेलिस कोठडी दिली आहे.

दोन दिवसांपासून वातावरण खराब

मतमोजणी झाल्यापासून वातावरण दूषित झाले आहे. दोन समाजांत वाद होत आहेत. भावना दुखावणाऱ्या पोस्ट, अफवा पसरवून वाद घातले जात आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही ठाकूर म्हणाले.

... तर पोलिसांवरही होणार कारवाई

सामान्य नागरिकांप्रमाणेच काही पोलिस अधिकारी, कर्मचारीही राजकीय नेत्यांचे स्टेटस ठेवत आहेत. तसेच वादग्रस्त मजकूर पोस्ट करत आहेत. यावरही ठाकूर यांनी सांगितले की जर असे निदर्शनास आले तर पोलिसांवरही कारवाई केली जाईल.

 

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया