शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

सेवा सोसायटीच्या सभासदांना पाचशे अन्‌ हजाराचे कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:39 AM

नृसिंह सूर्यवंशी घाटनांदूर : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून खरीप हंगामपूर्व सेवा सहकारी सोसायटी सभासद शेतकऱ्यांना कर्ज वाटपात अजब प्रकार ...

नृसिंह सूर्यवंशी

घाटनांदूर : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून खरीप हंगामपूर्व सेवा सहकारी सोसायटी सभासद शेतकऱ्यांना कर्ज वाटपात अजब प्रकार समोर आला असून, एक एकर ते अनेक हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना चक्क पाचशे ते हजार रुपये कर्ज वाटप करण्यात आले. गत वर्षीच्या कर्ज वाटपापैकी फक्त दहा टक्के वाढीव कर्ज वाटप करून डीसीसी बँकेने शेतकऱ्यांची चेष्टा चालविली आहे. बँकेवर प्रशासक मंडळ आल्यानंतर शेतकऱ्यांना फायदा होईल असे वाटले होते; मात्र येरे माझ्या मागल्या, असाच प्रकार सुरू आहे.

चोथेवाडी घोलपवाडी ग्रुप सेवा सहकारी सोसायटी १९९६ पासून २००५ पर्यंत संपूर्ण तालुक्यात शंभर टक्के वसुली असलेली एकमेव आहे. आज या संस्थेसह संपूर्ण तालुक्यातील सर्व सोसायट्या अडचणीत आहेत. चोथेवाडी सोसायटीच्या फक्त ४९ लोकांना कर्ज वाटप झाले. यापैकी २० सभासदांना पाचशे ते हजार रुपये वाटप केले असून, मुद्दल रकमेवर पन्नास रुपये ते शंभर रुपये वाढ केली आहे. २० लोकांना एक हजार ते दोन हजार तर २२ शेतकऱ्यांना चार ते चाळीस हजार रुपये वाटप केले आहे. चाळीस हजार रुपये कर्ज मिळालेले शेतकरी बोटावर मोजण्याइतकेही नाहीत. विशेष म्हणजे सर्व शेतकरी चालू बाकीत आहेत.

पैसा जमा असून, शेतकऱ्यांना मिळेना

पूर्वी शेतकरी सभासदांना एक लाख ते दीड लाख रुपये कर्ज मिळायचे. या संस्था साठ ते सत्तर लाख रुपये वाटप करायच्या. त्या आज चार ते पाच लाखांपर्यंत वाटप करत असून, संस्थेचे भागभांडवल सहा ते सात लाख रुपये जिल्हा बँकेकडे जमा आहे. अंबाजोगाई तालुक्यात एकूण ५७ सेवा सहकारी सोसायट्या आहेत. जिल्हा बँकेच्या धोरणांमुळे संपूर्ण जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायट्यांची वाट लागली असून, शेतक-यांचा पैसा जमा असूनही त्यांना कर्ज मिळत नसल्याची स्थिती आहे.

यासंदर्भात संस्था चेअरमन तथा अंबाजोगाई बाजार समितीचे संचालक ॲड. इंद्रजित निळे म्हणाले की, आम्ही बँकेचे तपासणी अधिकारी एस. एम. सोळंके यांना बँकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून पूर्वीचे वसूल केलेले कर्ज व त्यांचे भाग भांडवलानुसार वाटप करा, अशी विनंती केली. तरीही फक्त दहा टक्केच वाढ केल्याचे लोकमतला सांगितले.

संचालक बाबूराव जाधव म्हणाले की, डीसीसी बँक सेवा सहकारी सोसायट्या बंद पाडत असून, न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही, असे म्हणाले. तर गतवर्षीच्या कर्जापेक्षा फक्त दहा टक्के वाढ देऊन कर्ज वाटप करण्याचा आदेश बँक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिल्याचे तपासणीस एस. एम. सोळंके यांनी लोकमतला सांगितले.