शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

भूमिहीन गायरानधारकांना न्याय देण्यासाठी सदैव कटिबद्ध - जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:24 AM

आष्टी तालुक्यातील कडा येथे विविध अडीअडचणींसंदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. स्वाभिमानी रिपब्लिकन ...

आष्टी तालुक्यातील कडा येथे विविध अडीअडचणींसंदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व टायगर मूव्हमेंटचे शहराध्यक्ष प्रशांत भिंगरदिवे, काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय सेलचे उपशहराध्यक्ष संतोष जगताप, नितीन कांबळे व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की समाजात सध्या अन्याय, अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यासाठी आता यावर विचारमंथन करून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण शिकलोत, संघटित झालोत; पण खरा न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्यासाठी आता एकत्र येण्याची गरज आहे. त्याचबरोबर गायरानधारकांच्या नावे अतिक्रमित केलेली जमीन नावावर करण्यासाठी आणि हक्काचा सातबारा मिळावा यासाठी पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष रमेश साळवे याच्या माध्यमातून भटके, विमुक्त, अनुसूचित जाती, जमाती, भूमिहीन, लोकांना सोबत घेऊन लवकरच राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असे नाथाभाऊ आल्हाट यांनी सांगितले.

यावेळी दिगंबर जाधव, दीपक गरुड, अशोक जाधव, किशोर घोडके, बबलू आखाडे, कमलेश जाधव, विशाल जाधव, नितीन वाघमारे, शाहू घोडके, बाळू घोडके, सागर घोडके, अशोक राजगुरू, विशाल राजगुरू, संतोष जाधव, अशोक खरात, आकाश कांबळे, नाना मनतोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक गरुड यांनी सूत्रसंचालन केले, तर किशोर घोडके यांनी आभार मानले.