शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पाण्यासाठी आनंदगाव ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर 'घागर मोर्चा' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 16:23 IST

माजलगाव धरणातून पाईप लाईन करण्याची केली मागणी

माजलगाव (बीड ) : तालुक्यातील आनंदगावला पाणी टंचाईच्या भीषण झळा  सोसाव्या लागत आहेत. गावातील पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा या मागणीसाठी आज (दि.१७ ) सकाळी ११ वाजेच्या दरम्यान ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला. भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ सहभागी झाले होते. 

आनंदगावची लोकसंख्या जवळपास 4 हजारावर आहे. मागील अनेक वर्षापासून गावाला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या गावात टॅकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी तो खुप अपूरा आहे. यामुळे ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान 'घागर मोर्चा' काढण्यात आला. गावचा पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी माजलगाव धरणातून पाईप लाईन करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. मोर्चामध्ये महिलांसह युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते.

टॅग्स :WaterपाणीMorchaमोर्चाdroughtदुष्काळMajalgaon Damमाजलगाव धरणBeedबीड