शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ"; सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता
2
"OTT प्लॅटफॉर्ममुळे तरुणांवर वाईट परिणाम"; नियंत्रणासाठी कायदा करण्याची सरसंघचालकांची मागणी
3
प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी ३ मित्रांचा कारनामा; खावी लागली जेलची हवा
4
Video - रस्त्यावरुन जात होती २ लहान मुलं, अचानक कोसळलं घर; थरकाप उडवणारी घटना
5
Zerodha Nithin Kamath : ब्रोकर्स कधीही करू शकणार नाही 'हे' काम, SEBI च्या नव्या नियमांवर काय म्हणाले नितीन कामथ
6
"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन
7
सूर जुळले! अखेर अंकिताने दाखवला कोकण हार्टेड बॉयचा चेहरा, कोण आहे तो?
8
कमी पैशांमध्ये अधिक व्हॅलिडिटीचा प्लॅन शोधताय? BSNL चा हा प्लॅन ठरेल बेस्ट
9
७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?
10
Ratan Tata Successor Noel Tata : बुर्ज खलिफाशी आहे 'टाटा'चं कनेक्शन; Tata Trust चे अध्यक्ष नोएल टाटांवर आहे जबाबदारी
11
खळबळजनक! ऑनलाईन गेममध्ये अडकला जवान; रायफलसह आर्मी कँपमधून झाला फरार अन्...
12
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
13
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
14
जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
16
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
17
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
18
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
19
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
20
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत

मालदार ग्रामपंचायत मिळवण्यासाठी ग्रामसेवकात ‘लिलाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:36 AM

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : येथील पंचायत समितीचा कारभार कार्यालयातील वरिष्ठ सहायकच हाकत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : येथील पंचायत समितीचा कारभार कार्यालयातील वरिष्ठ सहायकच हाकत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. काही ग्रामसेवकांनी पैसे मोजून मालदार ग्रामपंचायतीत नेमणुका करून घेतल्याची माहिती समजली आहे. यासाठी ग्रामसेवकात लिलाव देखील झाल्याची चर्चा दबक्या आवाजात ग्रामसेवकात ऐकायला मिळत आहे.

जो ग्रामसेवक जास्त पैसे मोजेल त्यास मोठी ग्रामपंचायत असे फर्मानच काढण्यात आले होते, अशा आशयाच्या तक्रारी ग्रामसेवकांनी केल्या आहेत. यामुळे मागील आठवड्यापासून अनेक ग्रामपंचायतींना ग्रामसेवक पोहोचले नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आठ दिवसांपूर्वी तालुक्यातील दहा ग्रामसेवकांच्या बदल्या इतर तालुक्यात झाल्या होत्या. त्यांच्या जागी इतर तालुक्यातून दहा जण या ठिकाणी रुजू झाले. ते रुजू होताना त्यांना कोणती ग्रामपंचायत द्यायची याची खलबते सुरू झाली. ग्रामसेवकांना पसंतीची ग्रामपंचायत हवी असल्यास त्याचे दर ठरविण्यात आले. नवीन ग्रामसेवकांना आर्थिक व्यवहारातून पाहिजे त्या ग्रामपंचायती दिल्या. त्या गावातील ग्रामसेवकांच्या देखील इतरत्र बदल्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे जुन्या ग्रामसेवकांच्या काहीच तक्रारी नसताना त्यांच्या अचानक बदल्या झाल्याने सरपंच व नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

याबाबत नव्या व जुन्या ग्रामसेवकांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मालदार ग्रामपंचायत पाहिजे असल्यास त्याचे दर ठरविण्यात आले होते. जो जास्त बोली लावेल त्यांना मोठी ग्रामपंचायत, असे ठरवण्यात आले. हा सर्व प्रकार पंचायत समितीतील वरिष्ठ सहायक करीत असल्याचेही ग्रामसेवकांकडून सांगण्यात येत आहे. या सर्व बदल्यांमुळे माजलगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. दरम्यान, तालुक्यातील घळाटवाडी, केसापुरी, फुलेपिंपळगाव, भाटवडगाव या मालदार गावांसाठी ग्रामसेवकात आता रस्सीखेच सुरू झाली आहे.

----------

बदलीमागे कोण?

ग्रामसेवकांच्या बदल्या केल्यानंतर अनेक सरपंच व ग्रामस्थांनी पंचायत समितीत जाऊन वरिष्ठ सहाय्यकांकडे बदल्यांबाबत विचारणा केली. आमदार साहेबांनी सांगीतल्यावरून आपण बदल्या केल्या असल्याचे ते सांगत होते. असे येथे चौकशी केलेल्या सरपंच, ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामसेवकांच्या बदल्यांमागे केवळ वरिष्ठ सहाय्यकाच नसून त्यांना येथील वरिष्ठ अधिका-यांचे आशीर्वाद असल्याचीही चर्चा होती.

------

नवीन आलेल्या ग्रामसेवकांना गावांची माहिती नसल्यामुळे त्यांना इतर ग्रामसेवकांच्या जागी देण्यात आले आहे. यामुळे या बदल्यात आर्थिक व्यवहाराचा प्रश्नच उदभवत नाही.

-ए.एम.सिध्दीकी, वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती, माजलगाव.