शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

सावधान! १५३ गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:39 AM

दोन महिन्यांचा अहवाल : कोरोनाचे कारण सांगत पाणी नमुने पाठविण्यास अनुत्सुकता लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बॅक्टेरियासारख्या विविध आजारांपासून ...

दोन महिन्यांचा अहवाल : कोरोनाचे कारण सांगत पाणी नमुने पाठविण्यास अनुत्सुकता

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : बॅक्टेरियासारख्या विविध आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी आरोग्य विभागाकडून प्रत्येक गावातील पिण्याच्या पाणी साठ्यातील पाणी नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले जातात. ११ पैकी ७ तालुक्यांनी नमुनेच पाठविलेले नाहीत; परंतु ज्या चार तालुक्यांतील ८३५ पाणी नमुने आले, त्यापैकी तब्बल १५३ नमुने दूषित आढळले आहेत. मे व जून महिन्यातील हा अहवाल जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडून मिळाला आहे. यावरून पिण्याचे पाणीच आजाराचे कारण ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोरोना उपाययोजनांमध्ये आरोग्य विभाग व्यस्त झाला. त्यामुळे पिण्याचे पाणी नमुने घेण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. नमुन्यांची संख्या तर घटलीच, शिवाय ज्यांनी पाठविले त्यांचा दूषित येण्याचा आकडाही मोठा आहे. ग्रामीण भागातून ४७७ नमुने घेतले असून, त्यात १३१ दूषित आढळले आहेत, तसेच शहरी भागातून ३५८ नमुने घेतले असून, २२ दूषित आढळले आहेत. त्यांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. प्रयोगशाळेत रासायनिक सहायक करुणा गायकवाड, एस.एम. पोपळघट, आर.व्ही. वाघमारे, के.टी. जाधव, एम.आर. गायकवाड, बी.एल. दखणे ही टीम काम करते.

११ पैकी ७ तालुक्यांची कामात कुचराई

कसलेही कारण न सांगता प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायकांनी गावात जाऊन पिण्याचे पाणी असलेल्या सार्वजनिक पाणी साठ्यांचे नमुने प्रयोशाळेत पाठविणे बंधनकारक आहे.

असे असले तरी आरोग्य सहायक व इतर कर्मचारी कुचराई करतात. ११ पैकी सात तालुक्यांतून मागील दोन महिन्यांत पाणी नमुने पाठविण्यास कुचराई झाल्याचे उघड झाले आहे.

यात माजलगाव, आष्टी, धारूर, परळी, शिरूर, पाटोदा आणि वडवणी तालुक्यांचा समावेश आहे. येथील तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

या आरोग्य केंद्रांना पत्र

ज्या आरोग्य केंद्रांनी पाणी नमुने पाठविले नाहीत, अशांना प्रयोगशाळेकडून पत्र काढण्यात आले आहे. यात राजुरी, साक्षाळपिंपरी, चकलांबा, उमापूर, सादोळा, पात्रूड, किटीआडगाव, टाकरवण, गंगामसला, धामणगाव, कडा, सु. देवळा, खुंटेफळ, टाकळसिंग, भोगलवाडी, मोहखेड, पोहनेर, धर्मापुरी, नागापूर, सिरसाळा, मोहा, खालापुरी, शिरूर का., नायगाव, वाहली, डोंगरकिन्ही, अंमळनेर, आपेगाव, भावठाणा, कुप्पा या आरोग्य केंद्रांनी पाणी नमुने पाठविलेले नाहीत. येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच सामान्य जनता दूषित पाणी पित असल्याचे दिसते.

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या !

साथरोग व जलजन्य आजारापासून बचावासाठी पाणी उकळून पिण्याची गरज आहे.

पावसाचे पाणी कोठेही साचणार नाही याची काळजी घेऊन ते वाहते करावे.

सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसताच तत्काळ जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन उपचार करून घ्यावेत.

ज्या आरोग्य केंद्रांतर्गत गावातील पाणी नमुने गेले नाहीत, त्यांना तत्काळ सूचना केल्या जातील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार म्हणाले.

कोरोनामुळे पाणी नमुने येण्याची संख्या घटली आहे. पाणी नमुने पाठविण्यास उशीर झाल्यास तत्काळ पत्र काढले जाते, तसेच दूषित पाणी नमुन्यांची माहिती मेलद्वारे कळवून उपाययोजना करण्यास सांगितले जात असल्याचे वरिष्ठ रासायनिक सहायक करुणा गायकवाड म्हणाल्या.

120721\210412_2_bed_14_12072021_14.jpeg

जिल्हा प्रयोगशाळेत पाणी नमुणे तपासणी करताना पथक दिसत आहे.