शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
2
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
3
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
4
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
5
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
6
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
7
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
8
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
9
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
10
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
11
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खंत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
13
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
14
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
15
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
16
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
17
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
18
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
19
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
20
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप

छत्रपती शिवाजी महाराज दूरदृष्टीचे राजे होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 5:37 AM

माजलगाव : छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे असल्याने लोकांना स्वराज्याबद्दल आपुलकी होती. छत्रपती शिवाजी महाराज दूरदृष्टीचे ...

माजलगाव : छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे असल्याने लोकांना स्वराज्याबद्दल आपुलकी होती. छत्रपती शिवाजी महाराज दूरदृष्टीचे राजे होते. त्यांनी जलव्यवस्थापन व पर्यावरणाविषयी विशेष लक्ष दिले, असे प्रतिपादन आ. प्रकाश सोळंके यांनी केले.

येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार, डॉ. एन. के.मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. सोळंके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्ष व जातीनिरपेक्ष व्यवस्था निर्माण करून गुणवत्ता आणि निष्ठा असणारे मावळे निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याची काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.

शिवजयंतीनिमित्त महाविद्यालयात सामान्य ज्ञान व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण आ. सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. सामान्यज्ञान स्पर्धेत हरी गायकवाड, गणेश तौर, बाळासाहेब पुजारी व रांगोळी स्पर्धेत गायत्री चाळक,अमृता विभुते,ज्ञानेश्वरी फपाळ यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले. प्रा. बालाजी बोडके यांनी आभार मानले.