शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
2
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
3
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
4
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
5
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...
6
"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं
7
"राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर..."; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान
8
Babar Azam, PAK vs ENG Test: बाबर आझम पाकिस्तानी कसोटी संघातून OUT; सईद अन्वर म्हणाला- "बेटा, प्रत्येक क्रिकेटर..."
9
कोण आहे जसीन अख्तर?; बाबा सिद्दीकी हत्याकांडातील चौथा आरोपी; पंजाब, हरियाणात मोठं नेटवर्क
10
पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या पत्नी आणि मुलीची हत्या, आरोपी फरार, संतप्त जमावाकडून तोडफोड
11
Canada vs India, Political Issue: "पुरावे द्या नाहीतर गप्प बसा"; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या सरकारला खडसावले!
12
IND vs NZ : "मला असा संघ हवाय जो एका दिवसात...", भारताचा 'हेड' गंभीरची 'मन की बात'
13
Nobel Prize for Economics: अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कोणाला मिळालं?
14
तो पाकिस्तानचा प्रॉब्लेम! Babar Azam संदर्भातील प्रश्नावर Ben Stokes चा रिप्लाय चर्चेत
15
झेड श्रेणीच्या सुरक्षेत किती जवान तैनात असतात? केंद्र सरकार व्हीआयपींना कोण-कोणती सुरक्षा पुरवते?
16
बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; 'ते' सहा जण कोण? पुणे कनेक्शनही समोर
17
"नरेंद्र मोदींची ‘मेक इन इंडिया' योजना ठरली 'फेक इन इंडिया' ", काँग्रेसची बोचरी टीका     
18
बांगलादेश भारताविरोधात इंटरपोलकडे धाव घेणार, तर समुद्रात चीनसाठी घातल्या पायघड्या
19
SBI मध्ये मेगा भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस; पगार तब्बल 25.75 लाख रुपये...
20
Hot Hot Hot! मल्लिका शेरावतवर फिदा झाले गुणरत्न सदावर्ते, हातात हात घेतला, लाजले अन्...; व्हिडिओ व्हायरल

कोरोनाकाळात बालविवाह वाढले; ८० रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:23 AM

बीड : जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून केली जाते. दरम्यान, कोयता वाढवण्यासाठी लवकरच लग्न करण्यात आल्याचे ...

बीड : जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून केली जाते. दरम्यान, कोयता वाढवण्यासाठी लवकरच लग्न करण्यात आल्याचे समोर आलेले आहे. तर, कोरोनाच्या काळात बालविवाहांचे प्रमाण वाढले असून, या काळात जवळपास ८० बालविवाह रोखण्यात यश आले, तर काही प्रकरणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

जिल्ह्यातील दीड वर्षांहून अधिक काळ कोरोनामुळे शाळा बंद आहेत. आता ग्रामीण भागात शासनाकडून आठवी ते बारावीच्या वर्गाची शाळा सुरू केली आहे. यावेळी मुलींची पटसंख्या कमी झाल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून आले आहे. दरम्यान, या काळात ज्यांचे बालविवाह रोखले त्या मुलींना शाळेत पाठवले जात नसल्याचे समोर आले आहे. तर, या तीन महिन्यांच्या काळात जिल्हाभरात जवळपास ८० बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. तसेच त्या पालकांचे समुपदेशन करून त्या मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व देखील यावेळी त्यांना पटवून देण्यात आले असून, विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी याचा परिणाम सकारात्मक झाला, तर काही प्रकरणांत परगावी पाठवून विवाह केल्याचे समोर आल्याने त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पटसंख्या कमी झालेल्या मुली गेल्या कुठे?

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या सातवीपर्यंतच्या शाळा असतात. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या गावी जावे लागते. पालक आपल्या मुलींना गावाबाहेर शाळेत पाठविण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे त्यांच्या विवाहाचे प्रयत्न सुरू होतात.

दहावीच्या विद्यार्थिनींची संख्या घटली?

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, या दहावीच्या पुढील वर्गातील विद्यार्थिनींची संख्या काही प्रमाणात घटली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून माहिती घेत कारणे शोधणे गरजेचे आहे.

आर्थिक विवंचना हेच कारण

कोरोना काळात अनेकांचा रोजगार हिरावला, ग्रामीण भागातही हेच चित्र आहे. परिणामी पालक आपली जबाबदारी पूर्ण करण्याची घाई करत होते. ग्रामीण भागात व ऊसतोड कामगारांमध्ये बालविवाहाचे प्रमाण आहे.

एकूण विद्यार्थी उपस्थिती : २,६५२

किती शाळा सुरू : ८०

किती अद्याप बंद : ६७२

कोरोना काळात बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच त्या गावात जाऊन आम्ही समुपदेशन करून अनेक बालविवाह रोखले आहेत. मात्र, अनेक प्रकरणांत आर्थिक विवंचना व पालकांची बेरोजगारी हेच कारण असल्याचे समोर आले आहे. सर्वांनी सतर्क राहून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावेत.

तत्त्वशील कांबळे, बालकल्याण समिती सदस्य, बीड