शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
2
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
3
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
4
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
5
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
6
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
7
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
8
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
9
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
10
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
11
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
12
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
13
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
14
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
15
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
16
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
17
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
18
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
19
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
20
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा

नागरिक बिनधास्त; मास्क, सॅनिटायझरची विक्री घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 4:38 AM

अंबाजोगाई व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांमध्ये बिनधास्तपणा वाढल्याने कोरोना प्रतिबंधक उपायांकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. दुसऱ्या ...

अंबाजोगाई व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांमध्ये बिनधास्तपणा वाढल्याने कोरोना प्रतिबंधक उपायांकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोनाच्या संसर्गापासून बचाव म्हणून मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार धुणे, फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे. हे नियम सांगितले जात होते व पालनही होत असे. डबल मास्क वापरा आणि कोरोना टाळा असाही सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मार्च ते मे या तीन महिन्यात मास्कच्या विक्रीतही मोठी वाढ झाली होती. जून महिन्यापासून लाट ओसरत असल्याने नागरिक बिनधास्त झाले आहेत. आता मास्क वापरणेही अनेकांनी बंद केले आहे. सुरक्षिततेच्या त्रिसूत्रीचा विसर अनेकांना पडू लागला आहे.

त्रिसूत्रीचे पालन महत्त्वाचे

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी अजूनही कोरोना संपलेला नाही. आपल्या परिसरात दररोज ४ ते ५ रुग्ण बाधित निघत आहेत. याशिवाय तिसऱ्या संभाव्य लाटेची भीती व्यक्त होत आहे. यासाठी मास्कचा वापर, सॅनिटायझर व सतत हात धुणे ही त्रिसूत्री कायम चालू राहू द्या. सुरक्षिततेसाठी लसीकरणाचे दोन डोस घ्या.

- डॉ. अतुल शिंदे,

मधुमेह तज्ज्ञ, अंबाजोगाई.