शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
2
पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
3
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
4
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
5
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
6
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
7
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
8
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
9
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
10
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
11
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
12
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
13
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
14
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
15
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
16
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
18
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
19
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
20
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 

महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवरही विसंवाद; तीनही पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या वरिष्ठांकडे तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2022 4:55 PM

राज्यात महाआघाडीचेच सरकार असले तरी कामे होत नसल्याची तक्रार कॉंग्रेसच्या २७ आमदारांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे नुकतीच केली आहे. अशाच तक्रारी जिल्ह्यातदेखील आहेत.

- अनिल लगड

बीड : राज्यात भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले; परंतु सत्तास्थापनेपासून राज्यात तिन्ही पक्षांत अनेक कारणांवरून मतभेद दिसून येत आहेत. असेच चित्र बीड जिल्ह्यात जिल्हापातळीपासून गावपातळीपर्यंत पाहायला मिळत आहेत. पालकमंत्री धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्याही जास्त आहे. यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीचेच वर्चस्व दिसून येत आहे. महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या शिवसेनेला कुठेच स्थान मिळत नाही, असा आरोप शिवसेनेचे पदाधिकारी जाहीरपणे करताना आहेत; तर जिल्ह्यात काँग्रेसकडे राज्यसभेत रजनी पाटील यांच्या रूपाने खासदारपद आहे. तरीही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांत स्थानिक पातळीवर नाराजीचे चित्र आहे. फक्त सत्ता आपल्याही पक्षाची आहे, एवढेच समाधान मानून ‘तुझे माझे जमेना अन् तुझ्यावाचून करमेना,’ असेच राजकीय चित्र जिल्ह्यात आघाडीत दिसत आहे.

राज्यात महाआघाडीचेच सरकार असले तरी कामे होत नसल्याची तक्रार कॉंग्रेसच्या २७ आमदारांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे नुकतीच केली आहे. अशाच तक्रारी जिल्ह्यातदेखील आहेत. पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीत कुठेही महाविकास आघाडी एकत्र लढली नाही. बीड शहरात शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यांतील आरोप-प्रत्यारोप जाहीरपणे पाहायला मिळाले. माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचा सवतासुभा पाहायला मिळत आहे. गेवराईत राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांचाच गजर सुरू आहे. येथेही काँग्रेस, सेनेत अस्वस्थता दिसत आहे. आष्टी-पाटोद्यात राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे सत्तेत असूनही त्यांना काँग्रेस, सेनेचे पाठबळ दिसत नसल्याचे चित्र आहे. असे असले तरी निधी मिळविण्यात व कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींना कसरत करावी लागत आहे.

तक्रारी कोणाच्या काय?

काँग्रेस: राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे पालकमंत्री आहेत. त्यांनी आपल्याच मतदासंघात विकासाचा निधी वळविला आहे. यामुळे पालकमंत्र्यांकडून अन्याय होत आहे. आता त्यांचे पोट भरलेय. त्यांनी मन मोठं करून काँग्रेस, सेनेच्या सेवेसाठी निधी द्यावा. सत्तेत काँग्रेसचाही वाटा आहे; परंतु आमच्या कार्यकर्त्याला स्थानिक पातळीवर कामे करताना दुजाभाव केला जातो. यामुळे कार्यकर्त्यांत नाराजी आहे, असा आरोप काँग्रेसकडून केला जातो.

राष्ट्रवादी: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या जादूमुळे काँग्रेस सत्तेत आली आहे. सत्ता नसली की काय होते हे काँग्रेस, राष्ट्रवादीने पाहिले आहे. रस्ते, पाणी या प्रश्नांवर कोणतेही मतभेद नाहीत; परंतु स्थानिक पातळीवरील सत्तासंघर्षाचा प्रश्न आहे. कार्यकर्त्यांच्या ‘इगो’चा प्रश्न आहे. जिल्ह्यात सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत; परंतु सर्वसामान्यांच्या प्रश्नाला बगल दिली जात आहे.

शिवसेना: काँग्रेसच्या आमदारांची नाराजी काँग्रेसच्या मंत्र्यांवर आहे. आघाडीवर किंवा मुख्यमंत्र्यांबाबत नाही. सत्ता स्थापन करताना जो शिवसेनेचा हिस्सा आहे, त्याप्रमाणे कमिट्या व निधीचा वाटा मिळाला पाहिजे; याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली आहे, असे सेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सत्ताधाऱ्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रारी

एकंदरीत जिल्ह्यात सत्तेत राष्ट्रवादीचा मोठा वाटा आहे. यामुळे जे सूत्र आहे, त्या सूत्राप्रमाणे सर्वच ठिकाणी सेना, काँग्रेसला वाटा मिळाला पाहिजे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. याबाबत प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केलेल्या आहेत. वरिष्ठ काय निर्णय घेणार, हे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीBeedबीड