शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोलमडलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी प्रशासन बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 17:31 IST

विभागीय आयुक्त केंद्रेकर, जिल्हाधिकारी पांडे, आमदार प्रकाश सोळंके यांनी तालखेड, टाकरवण शिवारात केली पाहणी 

ठळक मुद्देतात्काळ पंचनामे करून विमा तसेच मदत देण्याच्या केंद्रेकारांनी केल्या सूचना 

माजलगाव :  मागील महिनाभरापासून पडत असलेल्या पावसामुळे तसेच मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची उभी पिके नेस्तनाबूत झाली. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे. कोलमडलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी माजलगाव तालुक्यातील तालखेड, टाकरवन याठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे, आ. प्रकाश सोळंके, तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे आदी उपस्थित होते. 

मागील आठवड्यात माजलगाव तालुक्यात मोठ्याप्रमाणात पाऊस झाला. त्यात माजलगाव धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन धरण 77 टक्के भरले, ही एकीकडे दिलासा देणारी बाब असली तरी शेतकऱ्यांचे मात्र या अतिवृष्टीत मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे हाताशी आलेले सोयाबीन पीक नष्ट झाले काही शेतकऱ्यांचे काढून ठेवलेले सोयाबीन जागीच नष्ट झाले तर काहींचे वाहून गेले. काढणी केलेल्या बाजरीला जागीच कोमारे फुटले तसेच कापसाच्या तर अक्षरशः झाडालाच वाती झाल्या काही ठिकाणी तर कापसाला जागेवरच करे फुटले असे अतोनात नुकसान शेतकऱ्यांचे झाले. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शनिवारी दुपारी तालखेड, टाकरवन शिवारात केली यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे , तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे आदींसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 

दरम्यान, आमदार प्रकाश सोळंके हे देखील याच भागात नुकसानीची पाहणी करीत होते. केंद्रेकर येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते देखील त्यांच्या सोबत दाखल झाले त्यांच्या समवेत बाजार समितीचे सभापती अशोक डक, जयदत्त नरवडे, रमेश सोळंके, राकेश साळवे , मोहन जाधव आदी उपस्थित होते. या वेळी आयुक्त केंद्रेकर यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या तसेच पीकविमा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी तात्काळ पाऊले उचलण्याचा सूचना केल्या.

टॅग्स :agricultureशेतीBeedबीडDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयPrakash Solankeप्रकाश सोळंकेFarmerशेतकरी