शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

डॉक्टरांनो सावधान; उपचारातील हलगर्जीमुळे रुग्ण दगावल्यास थेट निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:37 AM

बीड : शासकीय आरोग्य संस्थेत रुग्ण गंभीर असताना अपघात विभागात त्याची टोलवाटोलवी होते. त्याला वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे ...

बीड : शासकीय आरोग्य संस्थेत रुग्ण गंभीर असताना अपघात विभागात त्याची टोलवाटोलवी होते. त्याला वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे रूग्ण दगावतात; परंतु आता असे झाल्यास संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याचे थेट निलंबन होणार आहे. शासनाने शुक्रवारी तसे आदेश काढले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णसेवेला प्राधान्य देऊन उपचारात हलगर्जी होणार नाही, याबाबत सजग राहण्याची गरज आहे.

अपघात, साप चावलेले, झटका अथवा इतर गंभीर रुग्ण सर्वांत अगोदर अपघात विभागात येतात. येथील वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर उपचार करतात; परंतु नंतरच्या तपासण्या, खाट आदी सुविधांबाबत त्यांना टोलवाटोलवी केली जाते. यात त्यांचा बहुतांश वेळ वाया जातो. अनेकदा रुग्ण दगावल्याचीेही प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. अशाच एका प्रकाराला समोर ठेवून शासनाने शुक्रवारी आदेश काढत कामचुकार डॉक्टरांना चांगलाच दणका दिला आहे. यापुढे अपघात विभागात आलेल्या रुग्णावर उपचार करण्यास हलगर्जी अथवा त्याला इकडे तिकडे पळवापळवी केल्यास थेट निलंबनाची कारवाई केली जाणार आहे, तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नियम ३ चा भंग केला म्हणून शिस्तभंगाची कारवाईही प्रस्तावित केली जाणार आहे. या आदेशाने आता शासकीय संस्थेतील अपघात विभागात काम करणाऱ्या हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत, तर यामुळे प्रामाणिक डॉक्टरांना समाधान मिळाले आहे.

बीडमध्ये कायम टोलवाटोलवी

येथील जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयात गंभीर रुग्णांवर केवळ उपचार केले जातात. नंतर त्यांच्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. याबाबत नागरिकांनी तक्रारीही केल्या; परंतु डॉक्टरांवर कारवाया झाल्या नाहीत. यामुळेच कामचुकारांचे मनोबल वाढत गेले. आता या निर्णयाने वचक बसणार आहे.