शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
2
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
3
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
4
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
5
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
6
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
7
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
8
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतली विशेष काळजी; जवळच्या लोकांना भेटायला न येण्याचे केले आवाहन
9
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
10
'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!
11
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
12
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
13
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."
14
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
15
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
16
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
17
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र
18
किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..."
19
झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट
20
Baba Siddique : 'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको; आला पावसाळा, पोट सांभाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:23 AM

बीड : सध्या पावसाळ्याचे दिवस असून कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. वातावरणामध्ये दमटपणाही वाढला ...

बीड : सध्या पावसाळ्याचे दिवस असून कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. वातावरणामध्ये दमटपणाही वाढला आहे. यातच लॉकडाऊनचे निर्बंध सैल झाल्याने लहान-मोठी हॉटेल्स सुरू झाली आहेत. त्याचबरोबर रस्त्यांवर हातगाड्यांवर भजी, वडापाव, मिसळ, दाबेली, पोहे आदी अल्पाेपाहाराची दुकाने सुरू आहेत. गरमागरम भजे, पकोडे, वडा, मिसळभाजीचा खमंग सुगंध येताच मनाला आवर घालता येत नाही. मात्र पावसाळ्याच्या दिवसात आजार टाळण्यासाठी जिभेचे लाड कमीच असायला हवेत. त्याचबरोबर अनियंत्रित खाण्यावर मर्यादा घालण्याची गरज आहे. अति तेलकट, शिळे, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर परिणाम होत आहे. परिणामी पोटांचे आजार वाढतात. पावसाळी हंगामात पचनक्रिया मंदावते व प्रतिकारशक्ती कमकुवत होते ती वाढविण्यासाठी आवश्यक तोच चांगला व शुद्ध आहार घेण्याची गरज आहे. पावसाळ्यात हे खायला हवे

धान्याच्या विशेषत: साळीच्या लाह्या, दगडी पोहे, मुगाचे वरण मोड आलेली कडधान्ये, भाज्यांचे सूप,

आहारात गुळाचा वापरही महत्वाचा आहे. पचनास हलके व्यवस्थित शिजलेले ताजे गरम पदार्थ असलेला आहार महत्त्वाचा ठरेल.

गरम मसाला, हिंग, सुंठ, मिरी, जिरे, ओवा, लसणाचा वापर आहारात जास्त करण्याची गरज आहे.

पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे

शेतातून थेट बाजारात आलेल्या पालेभाज्यांमध्ये माती, चिखल लागलेला असतो. त्यामुळे कच्च्या पालेभाज्या खाऊ नये. कमी शिजवलेले पदार्थ खाऊ नये.

पचनास अवघड असणारे पदार्थ खायचे टाळावे. जंक फूड, फास्टफूड, दही, थंड पदार्थ खाऊ नये.

उघड्यावरील पदार्थ, शिळे अन्न, टाळावे. तळलेल्या पदार्थांचे सेवन शक्यतो कमी करावे.

दूषित अथवा सार्वजनिक ठिकाणचे पाणी पिण्याचे टाळावे.

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्याच्या दिवसात उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे म्हणजे रोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे. जंतुसंसर्ग, ताप, अतिसाराची लागण होण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी बाहेरचे अन्नपदार्थ वातावरण संतुलित होईपर्यंत न खाल्लेले चांगले. स्वच्छ पाणी उकळून पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पचनाला हलक्या असणाऱ्या पदार्थांचे सेवन महत्त्वाचे ठरते.

उघड्यावरचे पदार्थ खाणे धोक्याचे

पावसाळा कालावधीत पचनक्रिया मंद असते. मात्र भूक वाढते. त्यामुळे आहाराच्या बाबतीत संयम राखावा. उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळावे. असे पदार्थ टायफाईड, डायरियासारख्या विविध आजारांना आमंत्रण देणारे ठरू शकतात. शरीराला पोषक असलेले हलके पदार्थ खाणे उत्तम ठरेल. - डॉ. नीलेश जगदाळे, बीड.