शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मांजरा धरणात केवळ १.३७ टक्के पाणीसाठा राहिल्याने पाणीपुरवठा योजनांवर जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 16:23 IST

मांजरा धरणात चार महिने संपले, पावसाळा लोटला, तरी अद्यापही धरणात पाणी आले नाही.

ठळक मुद्देअंबाजोगाई व परिसरात जूनच्या प्रारंभीपासूनच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अत्यल्प पावसामुळे मांजरा धरणात केवळ १.३७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

- अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई (बीड) : अंबाजोगाई, लातूर, केज, धारूर, कळंब या मोठ्या शहरांसह आसपासच्या खेडयापाडयांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात चार महिने संपले, पावसाळा लोटला, तरी अद्यापही धरणात पाणी आले नाही. परिणामी आगामी काळात सात लाख नागरिकांची तहान भागवायची कशी, हा मोठा प्रश्न प्रशासनाला भेडसावणारा ठरत आहे. परतीचा पाऊस झाल्यानंतर धरणाचा पाणीसाठा वाढेल, अशी अपेक्षा लोक बाळगून होते. मात्र, तीही फोल ठरली. पावसाने दिलेल्या दग्यामुळे भविष्यात मोठे जलसंकट निर्माण होणार आहे.  

अंबाजोगाई व परिसरात जूनच्या प्रारंभीपासूनच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. झालेल्या पावसामुळे पेरण्या झाल्या मात्र, पाणीसाठा वाढला जाईल, असा एकही पाऊस जून ते सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत झाला नाही. जर आष्टी, पाटोदा, मांजरसुंबा या परिसरात मुसळधार पाऊस झाला तरच मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात मुबलक प्रमाणात वाढ होते. मात्र, गेल्या वर्षी मोठा पाऊस झाल्याने  धरण भरले होते. भरलेल्या धरणातील पाणी शेतकऱ्यांना देण्यात आले होते. तसेच पाणीपुरवठा योजनांची मोठी भिस्त असते. यावर्षी धरणातला पाणीसाठा शंभर टक्क््यावरून १.३७ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. ९८ टक्के पाण्याचा वापर वर्षभरात झाला.

या हंगामात आतापर्यंत एकही मोठा पाऊस न झाल्याने जमिनीवरून पाणी अद्यापतरी वाहिले नाही. परिणामी मांजरा धरणातील पाणीसाठा अद्यापही वाढला नाही. शहराच्या पाणीपुरवठ्याची मोठी भिस्त मांजरा धरणावरच आहे. मांजरा धरणातील पाणीसाठा संपत आल्याने धरणातून पाणीपुरवठा कधी ठप्प होईल. याची धास्ती अंबाजोगाईकरांना आहे.  अत्यल्प पावसामुळे मांजरा धरणात केवळ १.३७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन तसेच पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता हा साठा आणखी कमी होणार आहे.  शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून काळवटी साठवण तलावाचा आधार घेतला जातो. 

उपलब्ध असलेले पाणी कसेबसे तीन ते चार महिने शहरवासियांना देता येईल.  संपूर्ण पावसाळा लोटला तरी एकदाही मोठा पाऊस न झाल्याने परिसरातील सर्वच जलस्त्रोत निकामी झाले आहेत. ग्रामीण भागातही पाण्याची स्थिती पावसाअभावी दयनीय झाली आहे. परतीच्या पावसाच्या अपेक्षा बाळगून शेतकरी व नागरिक आशा ठेवून होते. मात्र तीही फोल ठरली. आता दसऱ्याच्या कालावधीत तरी पाऊस पडतो की नाही हीच शेवटची आशा शेतकरी बाळगून आहेत. 

पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षितमांजरा धरणात सध्या १.३७ द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. धरणात पाणीसाठा अत्यल्प राहिल्याने शेती अथवा इतर बाबींना पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे, अशी माहिती मांजरा धरणाचे उपअभियंता महेंद्र जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

मांजराभोवतालचे प्रकल्पही कोरडेठाकमांजरा धरणात पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी डोकेवाडा, अप्परमांजरा, वाघेबाभुळगाव, महासांगवी हे प्रकल्प भरल्यानंतर पाण्याचा प्रवाह धरणात येतो. संपूर्ण पावसाळा लोटला तरी मोठा पाऊस न झाल्याने आजूबाजूचे प्रकल्पच भरले नाहीत. तर धरणात पाणी येणार कोठून? अशा स्थितीमुळे पाणीपुरवठ्याची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. पूर्ण पावसाळा संपला तरी पाऊस न झाल्याने पाण्याचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणBeedबीडAmbajogaiअंबाजोगाईWaterपाणीRainपाऊस