शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोणत्या चुकांमुळे गेला सरपंच संतोष देशमुखांचा बळी? कोठे, काय उशीर झाला? पाहा, घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 11:20 IST

२९ नोव्हेंबरला तक्रार न दिल्याने ६ डिसेंबरचा गोंधळ; पुरावा चाटेने केला नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : वाल्मीक कराड, विष्णू चाटे यांनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला २९ नोव्हेंबर २०२४ रोजी खंडणी मागितली. तेव्हा तक्रार दिली असती, ६ डिसेंबरला कंपनीच्या कार्यालयात मस्साजोग येथे गोंधळ झाला नसता. तेव्हाही पोलिसांनी आरोपींवर कारवाई न करता चहापान केले. कराडचे नाव गुन्ह्यात येण्यासाठीही ३६ दिवसांचा वेळ लागला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठीही सरकारने ७३ दिवस उशीर केला. 

विष्णू चाटे याने २९ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘आवादा’चे अधिकारी सुनील शिंदे यांना कॉल केला. चाटेच्या मोबाइलवरून कराड बोलला. त्याच दिवशी सुदर्शन घुलेने कार्यालयात जाऊन खंडणी मागितली. परंतु शिंदे यांनी नकार दिला. त्यानंतर ६ डिसेंबरला घुलेसह त्याची टोळी मस्साजोगला गेली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सरपंच देशमुख यांना बोलावले. 

कोठे, काय उशीर झाला?

२९ नोव्हेंबर २०२४ : पहिल्यांदा खंडणी मागितली तेव्हा आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिली नाही.

६ डिसेंबर : भांडण झाल्यानंतर पोलिसांनी ॲट्रॉसिटी कलम लावले नाही.

९ डिसेंबर :  अपहरण झाल्यानंतर गुन्हा दाखल करून घेण्यास उशीर झाला. 

१० डिसेंबर : या प्रकरणात विष्णू  चाटे याचे नाव घेण्यास उशीर.

११ डिसेंबर  : वाल्मीक कराडसह इतरांवर खंडणीचा गुन्हा उशिराने दाखल.

३१ डिसेंबर : कराड सीआयडीला शरण.

१४ जानेवारी २०२५ : उशिराने वाल्मीक कराडचा हत्या प्रकरणात समावेश.

४ मार्च २०२५ : धनंजय मुंडे यांचा उशिराने मंत्रिपदाचा राजीनामा.

पुरावा चाटेने केला नष्ट

इतर काही महत्त्वाचे पुरावे हे विष्णू चाटे याच्या मोबाइलमध्ये होते. परंतु तो फरार असताना त्याने हा मोबाइल फेकून देत महत्त्वाचा पुरावा नष्ट केल्याचा दावा सीआयडीने दोषारोपपत्रात केला आहे. 

 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडDhananjay Mundeधनंजय मुंडेBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या