शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

तीन महिन्यानंतरही मांजरा धरणात केवळ ३१ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:37 AM

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरासह धारूर, केज, कळंब, मुरुड, लातूर व लातूर एमआयडीसी आणि एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या ...

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरासह धारूर, केज, कळंब, मुरुड, लातूर व लातूर एमआयडीसी आणि एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात यंदाच्या पावसाळ्यात फक्त ३० दलघमी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे प्रकल्प क्षेत्रात आणखी मोठ्या पावसाची गरज असून प्रकल्पात फक्त ३१.८३ टक्के इतका जिवंत साठा आहे.

या वर्षी पावसाळ्यात सर्वत्र मोठा पाऊस झाला. तीन महिने लोटली तरी मांजरा धरणाचा पाणीसाठा वाढलेला नाही. मांजरा प्रकल्पावर अनेक मोठी शहरे आणि गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. शिवाय, मांजरा प्रकल्प क्षेत्रांतर्गत मोठे पाणलोट क्षेत्र आहे. त्यामुळे प्रकल्प शंभर टक्के भरणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत प्रकल्पाची पाणी पातळी ६३८. ३३०मीटर आहे. सर्व शहरांसाठी प्रति महिना ३ दलघमी पाणी उचलले जाते. अंबाजोगाई शहरात किमान आठ दिवसाआड पाणी देण्यासाठी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची गरज आहे. २०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाईनंतर मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने दोनदा भरले आहे. यावर्षी ऑगस्ट खेर फक्त चोवीस दलघमी नवीन पाण्याची आवक झालेली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसावरच सर्व काही अवलंबून आहे. पिण्यासाठी मुबलक आणि शेतीला जेमतेम पाणी मिळण्यासाठी मोठ्या पावसाकडे अंबाजोगाईकरांचे डोळे लागले आहेत. आतापर्यंत प्रकल्प क्षेत्र परिसरात ४१० मिमी ४१० मिमी पाऊस झाला आहे. जूनपासून आजपर्यंत ३०.०२३ दलघमी नवीन पाणीसाठा झाला असला तरी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी पावसाची गरज आहे.

अशी आहे मांजरा धरणाची स्थिती :

प्रकल्पा क्षमता २२४.०९४ दलघमी असून, सद्य:स्थितीत (१०३.४५४) दलघमी आहे. त्यातील ४७.१३० दलघमी मृतसाठा आहे. पाणी पातळी गाठण्यासाठी मोठा पाऊस हवा आहे. सध्या धरणातील एकूण पाणीसाठा १०३.४५४ दलघमी आहे तर धरणाच्या पाणीसाठ्याची एकूण क्षमता २२४.०९३ दलघमी आहे. मृत पाणीसाठा ४७.१३० दलघमी आहे. सध्या प्रकल्पातील जिवंत साठ्याची टक्केवारी ३१.८३ टक्के आहे.