शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:24 AM

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आषाढ महिन्यात आपल्या माहेरी येणाऱ्या नवविवाहिताना माहेरी जाता येत ...

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आषाढ महिन्यात आपल्या माहेरी येणाऱ्या नवविवाहिताना माहेरी जाता येत नसल्याची खंत लागून राहिली आहे. माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा, अशी स्थिती नवविवाहितांची झाली आहे.

मराठी महिन्यांप्रमाणे वर्षाचा चौथा महिना आषाढ येतो. पावसाळ्याचे आगमन याच महिन्यातच होते. या महिन्यातील महत्त्वपूर्ण पहिल्या सणाला नवविवाहिता माहेरी जाण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. उन्हाळ्यात लग्न होऊन सासरी गेलेल्या नवविवाहितेला पावसाळा लागताच माहेरी घेऊन जाण्याची प्रथा आहे. आषाढ महिना लागला की प्रत्येक नवविवाहिता काही दिवसांसाठी तरी माहेरी जाते. माहेराची ओढ तिला या काळात लागलेली असते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे जाणे बंद झालेले आहे. नवविवाहितांचे डोळे आपल्या माहेराकडे लागून राहिले आहेत. कधी आपल्या माहेरचा भाऊ किंवा नातलग येतो आणि आपल्याला घरी नेतो, ही लगबग तिला लागून राहिलेली असते. अशा स्थितीत या नैसर्गिक महामारीने बाहेर जाणे कठीण बनले आहे. त्यामुळे तिचे दुःख सांगता येणे कठीण बनले आहे.

नवविवाहित मुलीच्या आईच्या भावना

विवाहानंतर सासरी गेलेल्या मुलीला आषाढामध्ये माहेरी आणण्याची प्रथा आहे; मात्र कोरोनामुळे सर्वच जनजीवन विस्कळीत करून ठेवले आहे. त्यामुळे येवढे वर्ष माहेरी न येता, प्रत्येक मुलीने आपल्या सासरलाच माहेर समजून त्या ठिकाणीच सण, उत्सव साजरे करणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गाची स्थिती पाहता, प्रत्येकाने घरात राहून काळजी घेणे आज गरजेचे झालेले आहे.

- रेखा अविनाश तळणीकर.

कोरोनामुळे यंदा मुलींना पहिल्या सणाला माहेरी जाता येत नाही. माहेरी जाण्याची प्रत्येक नवविवाहिता आतुरतेने वाट पाहते; मात्र यदा कोरोनामुळे बाहेर न पडणेच योग्य आहे.

- आशा पुरंदरे.

काय म्हणतात नवविवाहिता...

पहिल्या सणाला माहेरी जाण्याची ओढ प्रत्येक विवाहितेला असते. प्रत्येकीच्या मनात माहेरी जाण्याची प्रचंड उत्सुकता असते; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बाहेरगावी जाणे टाळणे आणि घरी थांबणे हेच महत्त्वाचे आहे. माझे सासरच, माझे माहेर झाले आहे.

- पल्लवी मोरगावकर

कोरोनामुळे नवविवाहितांची माहेराची वाटही अडविल्याचे दिसून येत आहे. पहिल्या आषाढीला माहेरी जाण्याची खूप इच्छा होती. माहेरच्या मंडळींची खूप आठवण येते. माहेरातील संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहते; मात्र सध्याच्या वातावरणात प्रवास करणे शक्य नाही.

- रेवती चोपणे.