अंबाजोगाई : नवनवे तंत्र वापरून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. मात्र असे करताना जमिनीचा पोत निकृष्ट होत असून भविष्यात जमीन नापिकी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी पिकांना संतुलित खतांची मात्रा द्यावी, मात्र अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर टाळावा. असे मत कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
------------------------------
रात्री उशिरापर्यंत चालतात व्यवसाय
अंबाजोगाई : कोरोना संकटामुळे दुपारी ४ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यासाठी परवाना ही आहे. मात्र शहरातील काही परिसरामध्ये काही व्यावसायिक रात्री उशिरापर्यंत आपले दुकान उघडे ठेवत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे. अशी मागणी करण्यात आली आहे.
--------------------------
अतिक्रमण हटाव मोहीम राबवा
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील विविध मार्गावर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिका प्रशासनाने सदर अतिक्रमण हटवून दिलासा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
-----------------------------
वाढत्या महागाईने नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. महागाई कमी करून दिलासा द्यावा. अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पेट्रोल डिझेलचे भावही सातत्याने वाढत आहे. कोरोना संकटामुळे प्रत्येक जण संकटात असतानाही महागाईमुळे अनेकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.
-----------------------
शहरातील अनधिकृत बॅनर हटवावे
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील विविध चौकांमध्ये अनधिकृत बॅनर लावण्यात आले असून यामुळे शहराच्या सौंदर्यात बाधा निर्माण झाली आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.