शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दूध दर कोसळल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:23 IST

कवडीमोल किमतीत पशुधन विकत शेतकरी करतोय बी-बियाणे खरेदी अमर हजारे दौला वडगाव : राज्यात दूध दराची मोठी घसरण झाल्याने ...

कवडीमोल किमतीत पशुधन विकत शेतकरी करतोय बी-बियाणे खरेदी

अमर हजारे

दौला वडगाव : राज्यात दूध दराची मोठी घसरण झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यातच पेरणीचे दिवस तोंडावर आहेत आणि मशागतीचे भाव आकाशाला भिडले आहेत. कवडीमोल किमतीत पशुधन विकत शेतकरी बी-बियाणे खरेदी करताना दिसत आहे.

महाराष्ट्रात टाळेबंदीच्या पूर्वी दुधाचे भाव समाधानकारक होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पशुधन वाढविण्याचा निर्णय घेतला आणि दुग्ध व्यवसायाचा मार्ग निवडला. यामुळे अनेक शेतकरी पुन्हा दुधाचा धंदा करू लागले. परंतु, अचानक महाराष्ट्रात पुन्हा टाळेबंदी लागू झाली आणि दुधाचे भाव गडगडले. यातच पशुखाद्य यांचे भाव मात्र तेजीत आहेत. दुधाच्या पैशातून पेंड आणि भुसा घेणेसुद्धा अवघड झाले आहे. दुधाच्या पगारातून पशुखाद्याची बरोबरीसुद्धा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे दिसते आहे

यातच पशुसंवर्धन करण्यासाठी लागणारा चारा हा चढ्या भावाने मिळतो आहे. उसाचा भाव प्रतिटन तीन हजार रुपये असल्याने एका मोळीला साधारण ६३ रुपये इतका खर्च येतो आहे. एका जनावरासाठी दोन मोळी हा हिशेब ठेवला तरी १२६ रुपये इतका खर्च होतो आणि खुराक आला साधारण पन्नास रुपये आणि तीच गाय दहा लिटर दूध देत असेल तर पंधरा, सोळा रुपये प्रतिलिटरने १६० रुपये होतात. अशी बिकट परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची आहे.

जून महिना सुरू असल्याने आणि पाऊसही चांगला झाल्याने शेतकरी आता पेरणीच्या मार्गावर आहे. परंतु, सोयाबीनचा एका पिशवीचा भाव ३१२५ रुपये असून, कांदा बी सुद्धा चांगलेच तेजीत आहे. जी परिस्थिती बियाण्यांच्या बाबतीत आहे, तीच शेती मशागतीची सुद्धा आहे. ट्रॅक्टरच्या पेरणीच्या भावात मोठा बदल झाला आहे. एक हजार रुपये असणारी पेरणी आता पंधराशेपर्यंत जाऊन पोहोचली आहे. ट्रॅक्टर नांगरट दोन हजारांपर्यंत, तर काकऱ्या पाळी १२०० रुपये इतक्या भावाने सुरू झाली आहे. डिझेल दरवाढीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. एकूणच काय तर बियाणे आणि ट्रॅक्टर मशागत वाढली असताना दुधाचा पडलेला भाव आणि गोधनाची मातीमोल किंमत ही शेतकऱ्यांच्या गळ्याभोवतालचा फास झाला आहे . गोधन विकून पेरणी करावी की बायकोच्या मंगळसूत्रावर पेरणीसाठी हात घालावा या द्विधा मन:स्थितीत शेतकरी अडकला आहे

दुधाचे भाव पडल्याने आता मोठी पंचायत झाली आहे. घरात गोडेतेल घ्यावे की नाही हीच समस्या झाली आहे. यातच पुढे पेरणी उभी आहे. अशीच परिस्थिती चालू राहिल्यास व्याजाने पैसे घेऊन पेरणी करावी लागेल.

संदीप रामगुडे (शेतकरी)

दुधाचे भाव पडल्याने शेतीचा जोडधंदा तोट्यात आला आहे. यातच कांदा जाग्यावर सडला. त्यामुळे दोन्ही बाजूने कोंडी झाली आहे , दिवसभर बाई शेतात काम करते तेव्हा एक तेलाची पिशवी येते, तर ट्रॅक्टरसाठी महिनाभर मजुरी करावी लागेल.

त्रिंबक जाधव (शेतकरी)