शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

शेतकऱ्यांचा आक्रोश! साखर आयुक्त व प्रादेशिक संचालकांची उसाच्या फडात प्रतीकात्मक प्रेतयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 1:42 PM

साखर आयुक्त कार्यालय हे शेतकऱ्यांच्या बाजूने नसून कारखानदारांच्या बाजूने आहेत.

माजलगाव (बीड) : जिल्ह्यातील ऊस प्रश्न आणि गेवराई तालुक्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणी साखर आयुक्त व प्रादेशिक संचालक यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा तालुक्यातील आनंदगाव येथे ऊसाच्या फडातून शेतकऱ्यांनी आज सकाळी काढली. अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असून शेतकरी हतबल झाल्याने टोकाचे पाऊलं उचलत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. 

गेवराई तालुक्यातील शेतकर्‍याने काही दिवसांपूर्वी शेतातील ऊस पेटवून देऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येमागे दोषी म्हणून साखर आयुक्त व औरंगाबाद येथील प्रादेशिक सहसंचालक असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत आक्रमक शेतकऱ्यांनी आज सकाळी तालुक्यातील आनंदगाव येथे साखर आयुक्त  व औरंगाबाद येथील प्रादेशिक सहसंचालक यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. 

यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी ऊस लागवड केल्यानंतर ऊसाच्या नोंदीची पावती शेतकर्‍यांना देण्यात यावी, त्याची अंमलबजावणी साखर आयुक्त कार्यालयाने केली नसल्यामुळे, तसेच 265 जातींचा शेतकर्‍यांचा ऊस साखर कारखान्याने घेऊन जावा अशी मागणी केली. 265 जातीचा ऊस शेतकऱ्यांना परवडतो. एक महिना पाणी नसले चालते, रान डुकरे खात नाही, वजनदार भरतो यासर्व कारणांमुळे कारखानदार सदरील ऊस घेऊन जात नाहीत. यामुळे साखर आयुक्त कार्यालय हे शेतकऱ्यांच्या बाजूने नसून कारखानदारांच्या बाजूने आहेत. त्यामुळे नामदेव जाधवसह इतर ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा बळी गेला. साखर आयुक्त कार्यालय हे कोटयावधी शेतकर्‍यांचे हित बघण्यासाठी निर्माण केलेले आहे. पण शेतकर्‍यांचे ते हित पाहत नाहीत, असा आरोप आंदोलकांनी केला. यामुळे तिरडी मोर्चा गंगाभिषण थावरे यांच्या नेत्वाखाली काढण्यात आला होता. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीBeedबीड