शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

शेतकऱ्यांच्या हाताला पीक लागणार नाही - सुनील केंद्रेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 00:10 IST

शेतक-यांनी काळजी करु नये या परिस्थितीत नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासन तत्परतेने कार्य करत आहे. असे आवाहन विभागीय आयुक्त सुनिल कंद्रेकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देनुकसानीचा घेतला आढावा । शासनाला सर्व परिस्थितीची माहिती दिली, काळजी करू नये

बीड : पीक वाढीच्या वेळी पासाने उसंत दिल्यामुळे वाढ व्यवस्थित झाली नव्हती. आणि आता काढणीच्या वेळी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरासरी ९० ते ९५ टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला पिक लागणार नाही. परंतु शेतक-यांनी काळजी करु नये या परिस्थितीत नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासन तत्परतेने कार्य करत आहे. असे आवाहन विभागीय आयुक्त सुनिल कंद्रेकर यांनी केले आहे.शनिवारी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी गेवराई, माजलगाव, बीड तालुक्यातील गावांमध्या शेतकºयांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना केंद्रेकर म्हणाले, प्रत्येक गावांत जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. शेतकºयांनी अर्ज भरलेला असो किंवा नसो पंचनामा मात्र होणार आहे. शेतकºयांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. सर्व बाधित शेतक-यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामा केला जाणार आहे. एकत्रितरित्या सर्व अर्ज स्विकारून त्यामुळे प्रत्येकाने तालुक्याला येऊन अर्ज देण्याची गरज नाही. विमा कंपनीकडून जिल्हाधिकारी यांच्या अहवालानुसार लाभ दिला जाणार आहे. तसेच एनडीआरएफ मधून देखील मदत मिळवण्याचा प्रयत्न आहे. तसेच तीन दिवसांत पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, येत्या १५ दिवसात शेतकºयांना मदत मिळण्याची आशा असल्याचे केंद्रेकर म्हणाले.

टॅग्स :Beedबीडcommissionerआयुक्तAgriculture Sectorशेती क्षेत्र