शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
2
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
3
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
4
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
5
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
6
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
7
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
8
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
9
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
10
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
11
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
12
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
13
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
14
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
15
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
16
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
17
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
18
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
19
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
20
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

मान्यता रद्द केलेल्या ३५ दिव्यांग शाळांचे ९ सप्टेंबरला ठरणार भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:37 AM

बीड : भौतिक सुविधांचा अभाव, विद्यार्थीसंख्येतील तफावत व नोकर भरतीतील अनियमिततेच्या कारणावरून राज्यातील ३५ दिव्यांग शाळांची मान्यता रद्द करण्यात ...

बीड : भौतिक सुविधांचा अभाव, विद्यार्थीसंख्येतील तफावत व नोकर भरतीतील अनियमिततेच्या कारणावरून राज्यातील ३५ दिव्यांग शाळांची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे. संस्थाचालकांनी याविरुद्ध केलेल्या अपिलावर ९ सप्टेंबर रोजी मंत्रालयात फैसला होणार आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सुनावणी होणार असून यात शाळांचे भवितव्य ठरणार आहे.

दिव्यांग शाळांना समाजकल्याण विभागाकडून लाखोंचे अनुदान मिळते. दिव्यांगांऐवजी संस्थाचालकांचेच यातून कल्याण होऊ लागल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे दीड वर्षांपूर्वी राज्यभरातील दिव्यांग शाळांची तपासणी केली होती. यात त्रुटी आढळलेल्या ३५ शाळांची मान्यता रद्द करण्यात आली होती. दरम्यान, या कारवाईविरुद्ध संस्थाचालकांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अवर सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्यानुसार ९ सप्टेंबर रोजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता ३५ शाळांची सुनावणी होणार आहे. यावेळी अभिलेख्यांसह उपस्थित राहण्यासंदर्भात संस्थाचालकांना कळविण्यात आले आहे. यात बीडमधील ११ दिव्यांग शाळांचा समावेश आहे. याशिवाय औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, नंदुरबार, नाशिक, वर्धा, धुळे व पुणे या जिल्ह्यांतील संस्थादेखील आहेत.

....

पुनर्मान्यतेचा घाट

दिव्यांगांना अपुऱ्या सुविधा देणाऱ्या, अनुदानावर डोळा ठेवून संस्था उघडणाऱ्यांना मान्यता रद्दच्या कारवाईने दणका बसला होता. मात्र, या संस्थाचालकांनी आता पुनर्मान्यतेचा घाट घातला आहे. त्यासाठी वजन वापरण्यास सुरुवात केली आहे. सामाजिक न्याय विभागाने या संस्थांवर कडक कारवाई करून पुनर्मान्यतेचा डाव हाणून पाडावा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे संस्थापक डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी केली आहे.