शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

शेतात काम करताना विजेचा धक्का बसून बापलेकाचा मृत्यू; एकाच चितेवर अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 18:06 IST

एकाच चितेवर पिता-पुत्राच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आष्टी : तालुक्यातील टाकळसिंग येथे शेतात काम करताना विजेचा शॉक लागून शेतकरी पिता- पुत्रांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. रात्री उशिरा एकाच चितेवर दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दादासाहेब विनायक कुमकर (वय ५५) बिभीषण दादासाहेब कुमकर (वय ३२) अशी मयत पिता-पुत्रांची नावे आहेत.

टाकळसिंग येथील शेतकरी दादासाहेब कुमकर व बिभीषण कुमकर हे आपल्या शेतात नव्याने डाळिंब बागाची लागवड करण्यासाठी काम करत होते. यावेळी शेतातील विद्युतपुरवठा होणाऱ्या खांबांवरील तारेवर करंट उतरला होता. या ताणेला स्पर्श झाल्याने दोघांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती कळताच नातेवाईक, शेजारील नागरिकांनी शिवारात धाव घेतली. बिभीषण यास उपचारासाठी जामखेड येथे घेऊन जाताना वाटेतच प्राणज्योत मालवली. तर त्याचे वडील दादासाहेब यांना आष्टी येथील रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांचाही मृत्यू झाला.

घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक शरद भुतेकर, पोह. अशोक शिंदे, पोना. प्रवीण क्षीरसागर, पोशि. मजर सय्यद, पोशि. राजाभाऊ सदगुणे यांनी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर मंगळवारी रात्री टाकळसिंग येथे एकाच चितेवर पिता-पुत्राच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दादासाहेब कुमकर यांना पत्नी, मुलगा, मुलगी तर बिभीषण कुमकर यांना पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

पाऊस झाल्यानंतर पोलजवळ जाऊ नयेपावसाळ्यात विद्युत ताराला चिटकण्याच्या घटना घडत असतात. नागरिकांनी व विशेषतः शेतकरीबांधवांनी याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. शेतात काम करत असताना पाऊस झाल्यानंतर विजेच्या पोलजवळ जाऊ नये, असे आवाहन महावितरण कंपनीचे उपअभियंता शिवाजी देशमुख यांनी केले आहे.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यूFarmerशेतकरी