शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
2
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
3
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
4
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
5
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
6
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
7
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
8
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
10
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
11
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
12
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
13
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
14
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
15
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
16
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
17
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
18
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
19
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
20
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?

पुराच्या भीतीने राजापूरकरांची आठवड्यापासून झोप उडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:40 AM

राजेश राजगुरू तलवाडा : गोदाकाठच्या गावातील लोकांच्या डोक्यावर पुराची टांगती तलवार लटकत असते. गोदावरी नदीला येणाऱ्या या पुरामुळे पावसाळा ...

राजेश राजगुरू

तलवाडा : गोदाकाठच्या गावातील लोकांच्या डोक्यावर पुराची टांगती तलवार लटकत असते. गोदावरी नदीला येणाऱ्या या पुरामुळे पावसाळा संपेपर्यंत लोकांना जीव मुठीत घेऊनच जगावे लागते.

याच भीतीने तालुक्यातील राजापूर येथील ग्रामस्थ झोपलेच नाहीत. या परिसरात आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. राजापूरच्या उत्तर बाजूने गोदावरी नदी वाहते, तर उर्वरित सर्व बाजूंनी नदी नाल्यांनी गावाला घेरलेले आहे. गोदावरीला पूर असो किंवा नसो, पण थोडा जरी पाऊस पडला की या ओढ्या, नाल्यांना पूर येऊन गावाचा संपर्क तुटतो.

गावातून बाहेर पडण्यासाठी असणाऱ्या एकमेव मार्गावर एक नदी व एक नाला आडवा येतो. यातील नाल्यावरील पुलावरून पूर्ण पावसाळाभर पाणी वाहत असल्यासारखेच असते. त्यात थोडा जास्त पाऊस झाला की या नाल्यावरील पुलावरून पाण्याचा प्रचंड वेगाने प्रवाह वाहत असतो. त्यामुळे पावसाळ्यात गोदाकावरील राजापूर या गावांतील लोकांना जीव मुठीत घेऊनच जगावे लागते.

सध्या गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. दररोज मुसळधार पाऊस पडत असल्याने आठ दिवसांपासून या गावाचा संपर्क तुटल्यातच जमा आहे.

त्यामुळे रात्रीच्या वेळी अचानक पाणीपातळी वाढून पूर येतो की काय या शंकेने या गावातील पुरुष, महिला, मुलांबाळासह रात्र जागून काढत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून या गावातील लोक झोपलेच नाहीत.

गावातून बाहेर निघण्यास रस्ता नाही. त्यात पाऊस चालू असतो आणि अचानक पाणी पातळी वाढली तर काय करायचे? या विचाराच्या तंद्रीत गावातील सर्वच लोकांची आठ दिवसांपासून झोप उडाली आहे.

कायम पुनर्वसन करण्याची मागणी

राजापूर हे गाव थोडा पाऊस आला तरी चोहोबाजूंनी पाण्याने घेरले जात असते. ही स्थिती प्रत्येक पावसाळ्यात असते,त्यामुळे गावाचे पुनर्वसन करावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.