शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:23 AM

अंबाजोगाई : दिवसेंदिवस वाढत्या महागाईने सर्वसामान्य लोकांचे जगणे सध्या कठीण झाले आहे. रोजच्या मिळकतीत जीवन जगणे तारेवरची कसरत होत ...

अंबाजोगाई : दिवसेंदिवस वाढत्या महागाईने सर्वसामान्य लोकांचे जगणे सध्या कठीण झाले आहे. रोजच्या मिळकतीत जीवन जगणे तारेवरची कसरत होत आहे.

इंधन व गॅस दरवाढीने कुटुंबाचा आर्थिक बोजवारा उडाला आहे. शेतकरी वर्ग इंधन दरवाढीच्या चक्रात सापडला असून, इतरही खर्चाची झालेली दरवाढ डोईजड होत आहे. सरकारने भरमसाट कर लावत सामान्यांचे आर्थिक बजेट बिघडवले आहे. अमर्याद इंधन दरवाढ झाल्याने गोरगरीब भरडला जात आहे. जीवनावश्यक वस्तूंसह इतरही पूरक वस्तूंच्या किमती इंधन दरवाढीच्या कारणाने वाढल्या आहेत. सरकार गरिबांची आहे, का मोजक्याच धनिकांचे? असा प्रश्न चर्चेत आला आहे. राजकारणी कोणत्याही पक्षाचा असो. मात्र, इंधन दरवाढ सगळ्यांचे दुखणे झाले आहे. एवढी दरवाढ यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. दोनशे रुपये मजुरी करणारा मजूर मात्र जगताना पावलोपावली शासनाला शाप देत आहे. डिझेल महागल्याने शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने होणाऱ्या कामांच्या दरातसुद्धा वाढ झाली आहे. ही दरवाढ सहन करावी लागत आहे.

सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना

डिझेलचे दर गेल्या काही दिवसां पासून सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत असून महागाई तीन पटीत वाढ झाली आहे. असे असतानाही शेतकरी मोठ्या उमेदीने खरीप हंगामाच्या तयारीला लागला असला तरी मशागतीचे दर वाढले असल्याने महागाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मजुरीचे दरही महागाईमुळे वाढले आहेत.

सरकारने तेलाचे दर कमी करावेत. शेतीला ट्रॅक्टरशिवाय पर्याय नसल्याने इंधन दरवाढ परवडणारी नाही. रोजच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने जगणे मुश्कील होत आहे. शेती उत्पादन खर्चात भरीव वाढ झाली आहे. ही शेतकऱ्यांना अजिबात परवडणारी नाही.

पीक कर्जही अपुरे

शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पेरणीपूर्व पीक कर्ज देण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. अत्यंत कमी व्याजदराने हे कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. अशा सूचना शासन देते. मात्र प्रत्यक्षात बँकेत शेतकऱ्यांची किरकोळ रकमेचे कर्ज देऊन बोळवण केली जाते. अन्यथा भरमसाट कागदपत्र किंवा हेलपाटे मारण्यापेक्षा जे मिळेल ते घ्यायचे. अशी वेळ शेतकऱ्यांवर आणली जाते.