शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

५० हजार रुपये दुष्काळी अनुदान द्या, दावणीला चारा द्या- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:45 AM

शासनाने दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रु पये दुष्काळी अनुदान द्यावे तसेच जनावरांना चारा दावणीला द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा खा. राजू शेट्टी यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : शासनाने दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रु पये दुष्काळी अनुदान द्यावे तसेच जनावरांना चारा दावणीला द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा खा. राजू शेट्टी यांनी केली. तालुक्यातील जवळबन येथील दुष्काळ निवारण व ऊस उत्पादक शेतकरी परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली.परिषदेच्या अध्यक्षस्थानी बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अंकुश काळदाते हे होते. यावेळी व्यासपीठावर वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ.प्रकाश पोपळे, रसिका ढगे, पूजा मोरे, विद्यार्थी आघाडीच्या शर्मिला येवले, जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, जि.कोषाध्यक्ष धनंजय मुळे उपस्थित होते.यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी हक्काच्या मागण्यांसाठी शेतक-यांनी रस्त्यावर यावे. आपण अखेरपर्यंत साथ देऊ अशी ग्वाही दिली. प्रभू रामाचा आदर असल्याचे सांगून राम मंदिर दोन महिन्यांनी झाले तरी चालेल; मात्र सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये दुष्काळी अनुदान त्वरीत द्यावे अशी मागणी त्यांनी केली. राज्य शासनाने संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी शेतक-यांनी लढा उभारण्याचे आवाहन तुपकर यांनी केले. तर यावेळी पूजा मोरे यांनी कारखानदारांनी व प्रशासनाने यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कमी लेखू नये असा इशारा देत शेतक-यांनी लाचारीचं जीवन जगणे सोडून द्यावे, असे आवाहन केले. यावेळी प्रा.डॉ. पोपळे, शर्मिला येवले, रसिका धगे यांनी मनोगत व्यक्त केलेकार्यक्र माचे प्रास्ताविक कुलदीप करपे यांनी केले. या परिषदेस केज तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीdroughtदुष्काळ