शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

तलावामुळे डोंगर पट्ट्यात हरितक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:37 AM

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : धारूरच्या डोंगरपट्ट्यात बारमाही दुष्काळी स्थिती होती. आता मात्र वाढत्या सिंचन प्रकल्पामुळे डोंगरपट्ट्यात हरितक्रांती होत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : धारूरच्या डोंगरपट्ट्यात बारमाही दुष्काळी स्थिती होती. आता मात्र वाढत्या सिंचन प्रकल्पामुळे डोंगरपट्ट्यात हरितक्रांती होत आहे. यंदा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे अरणवाडी साठवण तलाव पर्यटकांसाठी पर्यटन स्थळ बनला आहे. पाच ते सहा गावांत अरणवाडी तलावामुळे हरित क्रांती होऊ पाहत आहे. पावसाचे पाणी वाहून जाऊ नये म्हणून अरणवाडी साठवण तलावाचा निर्णय झाला. तलावाचे काम गेल्या पंधरा वर्षांपासून रखडले होते. तो यावर्षी पूर्ण झाला व पहिल्याच पावसात पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधानाचे वातावरण आहे. या रस्त्यांच्या बाजूने राष्ट्रीय महामार्ग ४५८ सी हा गेल्याने हा साठवण तलाव सर्वांचे आकर्षण ठरू लागला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे नुकसान होऊ नये म्हणून पाटबंधारेकडून या तलावाचा सांडवा फोडण्यात आला होता. हे प्रकरण वादग्रस्त ठरले होते. यानंतर पुन्हा कालव्याचे काम ‘जैसे थे’ करण्यात आले. त्यानंतरही तलाव भरल्याने पाणी सांडव्यावरून वाहू लागले. महामार्गावरून जाणाऱ्या निसर्ग प्रेमींसाठी हे आकर्षक पर्यटनस्थळच झाले आहे. या तलावामुळे चोरांबा अरणवाडी, थेटेगव्हाण, पहाडी पारगाव, ढगेवाडी, सोनीमोहा आदी गावातील शेतीला फायदा होणार आहे. यामुळे डोंगराळ जमीन ओलिताखाली येणार आहे. सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.

पर्यटनासाठी आकर्षण

अरणवाडी तलाव चोहोबाजूंनी डोंगर असल्याने निसर्ग सौंदर्याने फुलला आहे. महामार्गही जवळून जात आहे. यामुळे पर्यटक याकडे आकर्षित होत आहेत. यामुळे हा सेल्फी पॉइंट ठरत आहे. महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनादेखील सेल्फीचा मोह आवरत नाही. तलावामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती निर्माण होणार असल्याचे परिसरातील ग्रामस्थ बाळासाहेब चव्हाण म्हणाले.

040921\04bed_1_04092021_14.jpg