शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

पीक कर्जाचा वेग २० टक्क्यांपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:02 AM

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील २५ हजार ४४८ पात्र शेतकऱ्यांना मागणीनुसार १३८ कोटी ८४ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील २५ हजार ४४८ पात्र शेतकऱ्यांना मागणीनुसार १३८ कोटी ८४ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत कर्जवाटपाचे प्रमाण १९. ३५ टक्के इतके आहे.खरीप हंगामात गरजू व पात्र शेतकऱ्यांना ९५० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून १ एप्रिलपासून पीक कर्ज वाटपास सुरुवात झाली होती. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पीक कर्ज मागणीचे प्रमाण नसल्यासारखेच होते. मात्र हंगाम सुरु होण्याआधी मेच्या दुस-या आठवड्यापासून कर्ज मागणीचे प्रस्ताव शेतकरी करत होते. जिल्हाधिका-यांनी बॅँकर्स समितीची बैठक घेऊन उद्दिष्टपूर्तीसाठी सूचना दिल्या होत्या. तसेच दर सोमवारी आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले. तर जिल्हा अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला.बॅँकांना तसेच शेतक-यांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी समन्वयक म्हणून कामकाज सुरु ठेवले. काही बॅँकांकडून कर्ज वाटपास विलंब होत असल्याच्या तसेच इतर तक्रारी होत्या. तर काही प्रकरणात शेतक-यांनी एकापेक्षा जास्त बॅँकेकडून कर्ज घेतलेले असल्याची माहिती त्यांच्या सीबिल रिपोर्टमुळे स्पष्ट झाली. मात्र बॅँकांनी त्यांचे काम व्यस्थित व गतीने सुरु ठेवल्याने पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाणही घटले आहे. जिल्ह्यात १६ जुलैपर्यंत १७ बॅँकांच्या मार्फत १८३ कोटी ८४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.यंदा टक्का वाढणारकर्जमाफीमुळे अनेक शेतक-यांना कर्ज घेणे सुलभ झाले आहे. थकबाकी नसलेल्या पात्र शेतक-यांचे प्रस्ताव निकाली काढले जात आहेत.मागील वर्षी खरीप हंगामात वाटप केलेल्या कर्जाचे प्रमाण उद्दिष्टाच्या तुलनेत २५ टक्के इतके होते.खरीप हंगाम ३० सप्टेंबरपर्यंत असल्याने तसेच दमदार पाऊस झाल्यास मागणी होऊ शकते.त्यामुळे आतापर्यंतच्या कर्ज वाटपानुसार या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.२०१९-२० खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक, व्यावसायिक आणि राष्टÑीयकृत अशा १७ बॅँकांना एकूण ९५० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले असून त्यांच्या मार्फत कर्ज वाटफाची प्रक्रिया सुरु आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्र