शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

ताण आणि औषधांच्या माऱ्याने गेले डोक्यावरचे केस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे तणाव वाढला. तसेच जास्त प्रमाणात औषधांचा मारा झाल्याने डोक्यावरचे केस जात असल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे तणाव वाढला. तसेच जास्त प्रमाणात औषधांचा मारा झाल्याने डोक्यावरचे केस जात असल्याचे समोर आले आहे. केस गळतीला रक्त कमी होणे, चाई लागणे, वेगवेगळे आजार, व्हायरल इन्फेक्शन अशी विविध कारणे आहेत. परंतु याला वेळीच राेखण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधी चालू करावेत तसेच आहारही प्रोटीनयुक्त ठेवावा. यामुळे केस गळतीचे प्रमाण थांबते. घरगुती उपाय करतानाही चुकीचे उपचार होणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी.

कोविडनंतर तीन महिन्यांनी गळू लागतात केस

कुठलाही आजार झाल्यानंतर केस गळतीचे प्रमाण वाढू लागते. परंतु ज्यांना कोरोना होऊन दोन ते तीन महिने कालावधी झाला आहे, अशा लोकांचीही केस गळती सुरू होत आहे. या समस्या घेऊन जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे त्वचारोग तज्ज्ञांनी सांगितले.

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतरच करा घरगुती उपाय

n हिरव्या भाज्या, सफरचंद, सीताफळ अशी फळे खाण्यावर भर द्यावा तसेच दूध, दुधाचे पदार्थ, कडधान्य, अंडे यात प्रथिने जास्त असल्याने हेदेखील खावे.

n ज्यांच्या शरीरात रक्त कमी आहे, त्यांनी पेंडखजूर, गूळ, शेंगदाणा लाडू खावे. केस कमी होण्यास आजार, व्हायर इन्फेक्शन कारणीभूत आहे. त्यामुळे वेळीच उपचार करावेत.

हे करा

आजार अथवा रक्त कमी झाल्यास केस गळती होऊ शकते. त्यामुळे वेळीच हिमोग्लोबिन तपासावे.

रक्त कमी असेल तर वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रक्त वाढवायच्या गोळ्या घ्याव्यात.

केस गळतीचे टक्कल पडणे व चाई लागणे असे दोन प्रकार आहेत. टक्कल हा नैसर्गिक तर चाई हे आजाराचे कारण आहे.

त्यामुळे याकडे कोणीच दुर्लक्ष करू नये.

कोरोनामुक्तांनाही धोका

ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांचे केस गळती होत असल्याचे रुग्ण वाढले आहेत. परंतु घाबरून जाऊ नये. तपासणी आणि योग्य उपचार केल्यास याला आळा घालता येतो. - डॉ. आय.व्ही. शिंदे, त्वचारोग तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, बीड