शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

‘स्मशानभूमी असावी तर घाटनांदूरसारखी’ - A - A - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:37 AM

घाटनांदूर : गाव करील ते राव काय करील? असे म्हटले जाते. मात्र, घाटनांदूर येथे नेमके उलटे घडले असून, ते ...

घाटनांदूर : गाव करील ते राव काय करील? असे म्हटले जाते. मात्र, घाटनांदूर येथे नेमके उलटे घडले असून, ते केवळ एका व्यक्तीमुळे. माजी सैनिक बन्सीसाहेब जाधव यांच्या पुढाकारातून येथील स्मशानभूमीचा कायापालट केला आहे. पूर्वी अंत्यविधीवेळी बाहेरगावचे नाक मुरडणारे पाहुणे आज ‘स्मशानभूमी असावी तर घाटनांदूरसारखी’ असे म्हणताना दिसत आहेत. प्रेक्षणीय स्थळ वाटावे इतपत स्मशानभूमीची सुधारणा करण्यात आली.

निजामकालीन जहागिरीचे गाव असलेल्या घाटनांदूर येथे मराठा समाज (पाटील, देशमुख) मोठ्या प्रमाणात आहे. पारंपरिक स्मशानभूमी गावातील रेल्वे गेटजवळ भदाडा आंबा नामक जागेत होती. सर्वत्र घाणीचे साम्राज्य होते. जायला धड रस्ता नव्हता. पावसाळ्यात खांदेकऱ्यांना त्रास व्हायचा. एक पाय रोवला की दुसरा काढायचा, अशी बिकट अवस्था. रेल्वे पटरीने जावे तर रेल्वे, मालवाहतूक करणाऱ्या वॅगन कधी येतील याचा नेम नसे. अंत्यविधीला पाहुणा येणेही कठीण बनले होते. हे सर्व पाहून प्रा. सुरेश जाधव यांनी तपेश्वर मठ संस्थानजवळ झोपडपट्टी भागातील स्वतःची वीटभट्टीची जागा पाण्याच्या हौदासह स्मशानभूमीसाठी दिली. समाजाच्या निधीतून गेट बसविले आणि मृत्यूनंतर होणारी फरफट थांबली; पण कुंपण, सुशोभिकरण, विकासाचे काय? वेळ कोणी द्यायचा? या घोळात अनेक वर्षे गेली. अखेर माजी सैनिक तथा लक्ष्मी नारायण पतसंस्थेचे चेअरमन बन्सीसाहेब जाधव यांनी वैयक्तिक लक्ष देऊन सुरुवातीला स्वत: खर्च करत सुधारणेसाठी पुढाकार घेतला. माजी सरपंच ज्ञानोबा जाधव यांच्या सहकार्यातून रहिवाशांना विश्वासात घेत काटेरी कुंपण पूर्ण केले. साधे शेड असलेल्या स्मशानभूमीत चोहोबाजूने पत्रे वाढविले. सरण रचण्याआधी मृतदेह (तिरडी) ठेवण्यासाठी मोठा ओटा केला. तब्बल साठ टिप्पर काळी माती चोहोबाजूने टाकून वड, पिंपळ, लिंब, चंदन आदींसह शोभेची फुलझाडे लावली. यात प्रामुख्याने २४ तास ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचा भरणा अधिक आहे. कचखडी टाकून बाजूने विटा लावून रस्ता तयार केला. पितृपक्षात महत्त्वाच्या असलेल्या मोहाच्या झाडांची जवळपास ३० रोपे लावली. तुळशीपत्र, मंजुळांशिवाय अंत्यविधी होत नाही, याची जाणीव ठेवत तुळशीबन तयार केले आहे. अस्थिकलशासाठी लॉकर, अंत्यविधीसाठी आलेल्यांना विश्रांतीसाठी सिमेंटचे बाक आहेत. संपूर्ण झाडांना नियमित पाणी मिळावे म्हणून सर्वत्रच ठिबक बसविले. रोपट्यांची आता दहा ते बारा फुटांपर्यंत वाढ झाली आहे. बन्सी जाधव स्वतः दररोज सकाळी व संध्याकाळी फेरफटका मारून देखभाल करतात. त्यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून आदर्शवत असे वैकुंठधाम प्रत्यक्षात साकारले आहे.

मृत्यू हेच अंतिम सत्य

जन्मानंतर मृत्यू हेच आयुष्याचे अंतिम सत्य असून, जन्माचा उत्सव करतो, तसेच अंतिम ध्येय साध्य झाल्यास त्याचाही उत्सव व्हायला पाहिजे. सर्वांना प्रसन्न वाटावे, यादृष्टीने स्मशानभूमीची सुधारणा करण्याचे ध्येय मी अंगिकारले. यात समाजबांधव यथाशक्ती सहकार्य करीत असल्याचे सेवानिवृत्त सैनिक बन्सी जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.