शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
3
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
4
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
5
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
6
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
7
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
8
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
9
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
10
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
11
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
12
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
13
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
14
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
15
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
16
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
17
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
18
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
19
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
20
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण

यंत्रणा नसेल तर जलजीवन मिशनची कामे होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:40 AM

बीड : केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील १,३६७ गावांचा आराखडा बनविण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ४० प्रस्ताव मंजुरीसाठी ...

बीड : केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील १,३६७ गावांचा आराखडा बनविण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ४० प्रस्ताव मंजुरीसाठी गेले तर ७५ प्रस्ताव पूर्णत्वाकडे आहे. पण पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ही कामे गतीने होतील का? असा सवाल जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य अशोक लोढा यांनी उपस्थित केला.

शुक्रवारी ऑनलाइन बैठकीत जि. प. अध्यक्ष शिवकन्या सिरसाट, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, जि. प. सदस्य अविनाश मोरे, अशोक लोढा, प्रकाश कवठेकर तर प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे तसेच विभागप्रमुख सहभागी झाले होते.

जलजीवन मिशन अंतर्गत माणसी ५५ लिटर पाणी देण्याचे शासनाचे धोरण आहे. जिल्ह्यात काही प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात आहेत. परंतु पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. तांत्रिक कर्मचारी नाहीत, जे आहेत ते कंत्राटी तांत्रिक सल्लागार आहेत. त्यामुळे ही कामे होतील का? असे विचारत कंत्राटी अभियंते नियुक्त करावेत किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे योजना सोपवावी, असा मुद्दा अशोक लोढा यांनी मांडला. या बैठकीत पाटोदा तालुक्यातील एका शिक्षकाला दाखल गुन्ह्यात अटक होऊन तीन दिवसांपेक्षा जास्त अवधी झाला, त्याबाबत प्रशासकीय पातळीवर कार्यवाही का झाली नाही, अशी विचारणा करण्यात आली. यावर माहिती घेऊन कार्यवाही करू, असे उपशिक्षणाधिकारी अजय बहीर म्हणाले.

बर्दापूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी उपलब्ध नसतात व इतर अनियमिततेबाबत पदाधिकारी व सदस्यांनी तक्रार केली असता मंगळवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सीईओ पवार यांनी सांगितले.

----

प्रशासकीय मान्यतेला विलंब का?

जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीमध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जागा निश्चित केली आहे. यासाठी निधीदेखील मंजूर आहे. परंतु अद्याप प्रशासकीय मान्यता का घेतली नाही, अशी विचारणा जि. प. सदस्य प्रकाश कवठेकर, अशोक लोढा यांनी केली असता लवकरच प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

-------

पाणीदार गावांना विंधन विहिरी कशा मंजूर?

२०२०-२१ मध्ये विंधन विहिरींसाठी टंचाई आराखडा पाठविला होता. त्यानुसार केवळ ६८ विंधन विहिरी मंजूर झाल्या. परंतु या विहिरी टंचाईग्रस्त गावांऐवजी पाणी उपलब्ध असलेल्या गावांना मंजूर झाल्याने कोणता निकष लावला? पाणीपुरवठा विभागाने छाननी का केली नाही? काय साध्य केले? असे विचारत संबंधित अधिकाऱ्यांना सदस्यांनी धारेवर धरले.

-----------