शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

कीटकजन्य आजारांचा वाढला प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:23 AM

वडवणी : शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात कीटकजन्य आजाराचे रुग्ण वाढले आहे. डासांची उत्पत्ती होत असून नियंत्रणासाठी नगरपंचायतकडून कुठल्याही उपाययोजना ...

वडवणी : शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात कीटकजन्य आजाराचे रुग्ण वाढले आहे. डासांची उत्पत्ती होत असून नियंत्रणासाठी नगरपंचायतकडून कुठल्याही उपाययोजना राबविल्या जात नाही. घाणीचे साम्राज्य पसरले याचा परिणाम होत आहे.

रस्ता खड्डेमय

वडवणी : येथील आठवडे बाजार रस्ता खड्डेमय झाला आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतरावर असलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मार्ग काढताना त्रास होतो. गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी आहे.

पिकांवरील रोगांबाबत मार्गदर्शनाची मागणी

वडवणी : गेल्या हंगामात कापसावर आलेली बोंडअळी व बोगस सोयाबीन बियाणे, यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षीही अनेक शेतामधील सोयाबीन पिवळे पडले. तर कपाशीवर ही रोगाचे प्रमाण वाढले आहे. कृषी विभागाने ग्रामीण भागात जाऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

बांधकाम सुरू झाल्यास मिळेल रोजगार

वडवणी : कोरोनामुळे अनेक शासकीय बांधकामे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडली आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून, मजूर वर्ग आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शासकीय बांधकामे सुरू करण्याची मागणी होत आहे.

शैक्षणिक वर्ष सुरू तरी पाठ्यपुस्तक नाही

वडवणी : दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शिक्षा अभियान योजनेतून विद्यार्थ्यांचा हातात पडणारी पाठ्यपुस्तक यावर्षी अर्धा जुलै महिना संपत आला तरी विद्यार्थ्यांना मिळाली नाही. मागीलवर्षी जून अखेर पुस्तकांचे वाटप झाले होते. परंतु, यावर्षी मात्र पुस्तके कधी मिळणार, यावर कोणीच बोलायला तयार नाही. अशातच १५ जुलैपासून वर्ग आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली होत आहे. अशा स्थितीत पुस्तक शिवाय अध्यापन कसे करावे, अशा प्रश्न शिक्षकांपुढे, तर पुस्तकांविना अध्ययन व गृहपाठ कसा करावा, अशी समस्या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

शेतमजुरीचे दर वाढले

वडवणी : तालुक्यात यंदा मृग व रोहिणी नक्षत्राचा दमदार पाऊस बरसला. त्यामुळे नदी, नाले वाहते झाले. खरीप पिकांसाठी यंदा अनुकूल हवामान व पावसाची ही साथ मिळाल्याने कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांना पोषक वातावरण मिळत आहे. मात्र मजुरीचे सातत्याने वाढच असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर निघत आहे तर काही ठिकाणी शेतकरी त्रस्त झाले आहेत.

पिकांना जीवदान

वडवणी : तालुक्यात सलग दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने खरीप हंगामातील पिकांना पोषक वातावरण मिळत असून काही ठिकाणी झालेल्या पावसाने जीवदान ही मिळत आहे .अनेक दिवसांपासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी होते.