शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महागाई दुप्पट अन् मजुरीत केवळ २३ रुपये वाढ; रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणे परवडेना

By शिरीष शिंदे | Updated: April 5, 2024 12:52 IST

महाराष्ट्र रोजगार ग्रामीण योजना अर्थात मनरेगा ही केंद्र व राज्य शासन यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे.

बीड : महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या संदर्भाने नुकतेच गॅझेट प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या राज्यात मजुरीसाठीचे दर वेगवेगळे असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेल्या गोवा राज्यात प्रती दिन मजुरी ३५६ आहे, परंतु राज्यात मजुरी दर २९७ आहे. राज्यासह बीड जिल्ह्यातील मजुरीमध्ये केवळ २३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महागाईच्या जमान्यात रोहयो कामावर जाणे परवडत नसल्याचे मजुरांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र रोजगार ग्रामीण योजना अर्थात मनरेगा ही केंद्र व राज्य शासन यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना सुरू करताना अनेक बाबी डोळ्यासमोर ठेवल्या गेल्या. गावातच जलसंधारणाची कामे, बांधबंदिस्ती दुरुस्ती, भूमिगत पाट, मातीची धरणे, समतल चर, मजगी घालणे, दगडी संरोधक, सिंचन कालवे, सिंचन तलाव, जलाशयांचे नूतनीकरण यासह अनेक कामे मनरेगा योजनांतर्गत केली जात आहेत. या योजनेला बऱ्यापैकी प्रतिसादही मिळत आहे. मजुरी कमी असली तर कामाची हमी असल्याने अनेक जण या कामावर जात आहेत. बहुतांश वेळा काम करूनही मजुरी वेळेवर मिळत नसल्याची प्रकरणे मागच्या काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. आधीच मजुरी कमी त्यात विलंब यामुळे मजुरांची कोंडी होत आहे. वास्तविकत: मजुरीमध्ये भरघोस वाढ करणे अपेक्षित होते. परंतु, कमी वाढ करून एका प्रकारे मजुरांची थट्टाच केली जात आहे. महागाई वाढत असल्याने गोरगरिबांना जीवन जगणे कठीण झाले आहे. हाताला काम पाहिजे हे सत्य असले तरी दिवसभर राबून मोजकेच रुपये मिळत असतील तर कशामुळे रोहयो कामावर जावे, असा प्रश्न मजुरांपुढे निर्माण झाला आहे.

कामावर जावे की नाही महागाई वाढत चालली आहे, परंतु मजुरीमध्ये फारशी वाढ होत नसल्याने कामावर जावे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकामावर गेल्यास प्रती दिन मजुरी ३०० रुपयापेक्षा अधिक मिळते. रोहयोची मजुरी अधिक वाढली पाहिजे.-संजय काळे, धानोरा

मजुरीत वाढ करारोजगाराची हमी आहे, गावाच्या जवळ किंवा गावातच काम मिळत असल्याने ही योजना लाभदायक आहे. परंतु, अकुशल मजुरी फारच कमी आहे. आजच्या घडीला प्रत्येक गोष्ट महागली आहे. घराबाहेर पडले की खर्चाला सुरुवात होते. त्यामुळे मजुरीत वाढ झाली पाहिजे.-अलका कुदळे, येळंबघाट

प्रत्येक राज्याचा दर वेगवेगळाएका अधिकाऱ्याने सांगितले की, मजुरी कमी असल्याची ओरड प्रत्येक राज्यात आहे. परंतु, हे दर महागाईच्या तुलनेत कन्झ्युमर प्राइज इंडेक्सच्या कृषी मजुरीच्या आधारावर निश्चित करण्यात आलेले असतात. सध्याच्या कन्झ्युमर प्राइज इंडेक्स दर हा ७.७ असल्याने त्यानुसार ही वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक राज्याचा दर हा वेगवेगळा असल्याने त्यानुसार मजुरी वाढवली असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

असे आहेत दरराज्य- वाढलले मजुरीचे दर (रुपयांमध्ये)आंध्र प्रदेश-३००अरुणाचल प्रदेश-२३४आसाम-२४९बिहार-२४५छत्तीसगढ-२४३गोवा-३५६हरियाणा-३७४महाराष्ट्र-२९७

टॅग्स :Beedबीड