शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उपवासाला साबुदाणा न खाल्लेलाच बरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST

बीड : श्रावण महिना सुरू झाला आहे. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढते. परिणामी भगर आणि साबुदाण्याचे दर वाढले आहेत. ...

बीड : श्रावण महिना सुरू झाला आहे. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढते. परिणामी भगर आणि साबुदाण्याचे दर वाढले आहेत. उपवासात एनर्जी देणारे पदार्थ चवीला आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जाते. साबुदाणा खाल्ल्याने पेशींची वाढ होते. वजनवाढीसाठी उपयुक्त, हाडे मजबूत होतात. अशक्तपणा कमी होतो. यात सायनाइडचे प्रमाण कमी असलेतरी जास्त खाल्ल्याने विविध आजारांचा धोका उद्‌भवण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासात अनेक जण प्रमाणात सेवन करतात, तर साबुदाणा वर्ज्य करून अन्य पदार्थ खाण्याकडे अनेक लाेक वळत आहेत.

उपवासाच्या पदार्थांचे दर (प्रति किलो)

१० जुलै १० ऑगस्ट

भगर ११५ १२५

साबुदाणा ५५ ६०

नायलॉन साबुदाणा ७५ ८०

२) दर का वाढले?

नाशिक जिल्हा व घोटी परिसरात यंदा पीक कमी असल्याने भगरचे उत्पादन कमी झाले आहे. तर, तामिळनाडूच्या सेलम भागातही साबुकंद पीक कमी आहे. यातच वाहतूक दर वाढल्याने भाव काहीसे वधारले आहेत. जुलैच्या तुलनेत भगरीच्या दरात किलोमागे १० रुपयांची वाढ झाली आहे. साबुदाणादेखील किलोमागे ५ रुपयांनी वधारला आहे. मात्र, भाव स्थिरच असल्याचे सांगण्यात येते.

३) साबुदाणा आरोग्याला हानिकारक

जास्त साबुदाणा खाण्याचे परिणाम घातक आहेत. साबुदाण्यात कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मधुमेहाची पातळी वाढते. साबुदाणा खाण्याआधी मधुमेहींनी डॉक्टरी सल्ला घेणे महत्त्वाचे. जास्त साबुदाणा खाल्ल्याने स्थूलपणा आणि वजन वाढू शकते. त्यामुळे अधिक सेवन मेंदू, हृदय, कोमा, श्वास घेण्यात अडथळा, छाती दुखणे, रक्तविकार, डोकेदुखी, थायरॉइड असे आजार बळावू शकतात. विशेषत: कॅन्सरला आमंत्रण ठरू शकते, असे विविध तज्ज्ञांचे मत आहे.

४) उपवास आहे, मग हे पदार्थ खा !

उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त फळांचे सेवन करणे चांगले. फळांमध्ये प्रोटीन आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने थकवा न येता पाणीप्रमाण कमी होणार नाही. गूळ, शेंगदाण्याची चिक्की, राजगिरा लाडू खाल्ल्याने थकवा जाणवत नाही, ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते. नारळ पाण्याच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात.

- मितेश गवते, आहारतज्ज्ञ बीड.