शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

भाज्यांना कवडीमोल भाव, त्यावर कोरोनाचा घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:59 AM

माजलगाव : तालुक्यात मागील ३-४ महिन्यात ग्राहकांअभावी भाजीपाल्याचे भाव कवडीमोल झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना तो भाजीपाला काढायला ...

माजलगाव : तालुक्यात मागील ३-४ महिन्यात ग्राहकांअभावी भाजीपाल्याचे भाव कवडीमोल झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना तो भाजीपाला काढायला देखील परवडत नसतानाच कोरोनामुळे आठवडी बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.

गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने शेतातील विहीर व बोअर तुडुंब भरून वाहू लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी वेळेत उत्पन्न मिळावे म्हणून मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड केली होती. यामुळे मागील ३-४ महिन्यांपासून बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे भाव गडगडलेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील भाजीपाला काढायचा खर्चदेखील निघणे अवघड झाले आहे.

तालुक्यात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात येत असल्याने व पाहिजे त्याप्रमाणात ग्राहक नसल्याने भाजीपाल्यांचे भाव गडगडलेले होते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची उपजीविका भाजीपाल्यावरच आहे त्यांचे सध्या बेहाल झालेले दिसून येत आहे. त्यातच पुन्हा कोरोनामुळे तालुक्यातील सर्वच ठिकाणचे आठवडी बाजार बंद केल्याने शेतात आलेला भाजीपाला कोठे विकावा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादित भाजीपाला काढून बांधावर फेकल्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्यायच उरलेला नाही. यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

-------

मागील ३-४ महिन्यात वांगे २० रुपये, दोडका २५ ते ३०, शेवगा ३०, टोमॅटो ५ , मेथी १०,पालक १०, गाजर २०, शेपू-चुका २०,लसूण ६०, कांदे ३०, पत्ता व फुल कोबी १०, कोथिंबीर २० रुपये किलो भावाने विकला जात आहे.

अगोदरच भाजीपाल्याला भाव नसल्याने आमचा खर्च निघणे मुश्कील झाले होते. व सध्या कोरोनामुळे आठवडी बाजार बंद असल्याने आम्हाला शेतातील भाजीपाल्यांचे काय करायचे हा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला भाजीपाला विक्रीसाठी जागा व वेळ ठरवून दयावा, त्यामुळे आमचे नुकसान होणार नाही.

--- लक्ष्मण राऊत, भाजीपाला उत्पादक शेतकरी,उमरी