शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

रासायनिक खतांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:26 AM

अंबाजोगाई : रासायनिक खतांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य शासनाने खतांवर अनुदान देऊन खतांचे ...

अंबाजोगाई : रासायनिक खतांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य शासनाने खतांवर अनुदान देऊन खतांचे दर कमी करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली आहे.

केंद्र शासनाने खतांचे दर ठरविण्याचे अधिकार संबंधित कंपन्यांना दिल्याने त्यांची मनमानी वाढली आहे. ’इफको’सह इतर खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा स्थितीत पिकांना खतांचा डोस द्यायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. एकीकडे खतांचे दर वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला खतांच्या काळ्या बाजारामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच लिकिंग ही व्यवस्था त्याच्या माथी मारली जात आहे, अशा अडचणीत शेतकरी अडकला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी शासनाने खतांवर विशेष अनुदान देऊन खतांचे दर कमी करावेत.

शेतकऱ्याला शेती करत असताना रासायनिक खते ही महत्त्वपूर्ण बाब बनली आहे. ऊस, सोयाबीन, गहू, ज्वारी, उडीद, मूग, मका, अशा सर्वच पिकांना डीएपी, युरिया व विविध खतांची सातत्याने गरज भासते. ज्या तुलनेत खतांचे भाव वाढले आहेत. त्या तुलनेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. खतांचे वाढलेले भाव, महागडी बियाणे व मजुरीचे वाढलेले दर अशा स्थितीत उत्पादन खर्च निघणेही दुरापास्त होते. अशा स्थितीत पुन्हा रासायनिक खतांचे वाढलेले भाव शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे आहेत. यासाठी राज्य सरकारने अनुदान देऊन खतांचे दर कमी करावेत, अशी मागणी कालिदास आपेट यांनी केली आहे.