शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

मांजरा धरणाचे दरवाजे उघडण्यास उशीर, पाच गावांतील शेतात घुसले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 16:00 IST

नुकसानीसाठी लातूर पाटबंधारे विभागाची हलगर्जीपणा कारणीभूत

ठळक मुद्देशेतात पाणी घुसत असल्याची ओरड होऊ लागताच सोमवारी सकाळी मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. कालव्यावाटे थोडे थोडे पाणी सोडायचे ठरले असताना चार दिवस उशीर करून नदीपात्राने पाणी सोडले

अंबाजोगाई : तालुक्यातील धनेगाव प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरूनही लातूर पाटबंधारे विभागाने चार दिवस धरणाचे दरवाजे उघडले नाहीत. परिणामी क्षमतेपेक्षा धरणाची पाणीपातळी अधिक वाढल्याने बॅक वाॅटर पाच गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात घुसून उभ्या पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केज विधानसभा मतदारसंघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी केली आहे. 

मांजरा धरणाची पूर्ण संचय पातळी ६४२.३७ मी. एवढी आहे. परतीच्या पावसामुळे पाण्याची आवक चांगली होऊन २७ ऑक्टोबर रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरून पाणीसाठा २२४ दलघमी झाला, तरीदेखील पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त साठ्याचा विसर्ग करणे आवश्यक होते. मात्र, लातूर पाटबंधारे विभागाने धरण भरून चार दिवस झाले तरी दरवाजे उघडलेच नाहीत. परिणामी पाणीपातळी ७ सेंमीने वाढून ६४२.४४ मी. झाल्याने बॅक वाॅटरचे पाणी सादोळा, भालगाव, सोनेसांगवी, सुर्डी या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. यामुळे शेतीचे आणि उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  या नुकसानीसाठी लातूर पाटबंधारे विभागाची हलगर्जीपणा कारणीभूत असल्याची तक्रार आ. नमिता मुंदडा यांनी रविवारी जलसंपदामंत्र्यांकडे करत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचीही मागणी केली.

कालव्याऐवजी दरवाजांद्वारे सोडले पाणी  दरम्यान, शेतात पाणी घुसत असल्याची ओरड होऊ लागताच सोमवारी सकाळी मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. या दरवाजांमधून सध्या ९.८९६ क्युसेक वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, कालव्यावाटे थोडे थोडे पाणी सोडायचे ठरले असताना चार दिवस उशीर करून नदीपात्राने पाणी सोडल्यामुळे पाणी वाया जात आहे. त्यामुळे दरवाजे बंद करून पाणी कालव्याद्वारे सोडण्यासाठी आ. नमिता मुंदडा सोमवारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्नशील होत्या.

 

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणBeedबीडFarmerशेतकरी