शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
2
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
3
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
4
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
5
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
6
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
7
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
9
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
10
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
11
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
12
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
13
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
14
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
15
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
16
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
17
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
18
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
19
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
20
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर

पत्राच्या प्रवासाला लागले तीन महिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:23 AM

उजनी : भारतीय स्टेट बँकेने खातेदाराला मार्च महिन्यात पाठविलेले खात्याबद्दल माहिती देणारे पत्र संबंधित खातेदारास तब्बल चार महिन्यानंतर मिळाले ...

उजनी : भारतीय स्टेट बँकेने खातेदाराला मार्च महिन्यात पाठविलेले खात्याबद्दल माहिती देणारे पत्र संबंधित खातेदारास तब्बल चार महिन्यानंतर मिळाले असून, तीन महिने ते पत्र उजनीच्या टपाल कार्यालयात पडून राहिल्याचे दिसत आहे.

घाटनांदूर टपाल कार्यालयांतर्गत चालत असलेल्या उजनी येथील बी.ओ. कार्यालयाचा दप्तर दिरंगाईपणा यानिमित्ताने उघडकीस आला आहे. घाटनांदूर येथील भारतीय स्टेट बँकेत खाते असणारे ग्राहक विठ्ठलराव कातकडे यांच्या खात्यातील माहिती अपडेट झाल्याविषयी खातरजमा करणारे पत्र बँकेने मार्च महिन्याच्या १६ तारखेला पाठविले होते. ते उजनीच्या टपाल कार्यालयात एप्रिलच्या ८ तारखेला पोहोचले असताना उजनी ते कातकरवाडी हा तीन किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी पत्राला टपाल कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तब्बल तीन महिने लागले असून, ते पत्र १३ जुलै रोजी मिळाल्याचे कातकडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अशा दप्तर दिरंगाईमुळे भविष्यात कुणाचे नुकसान होऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.