शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
2
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
3
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
4
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
5
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
6
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
7
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
8
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
9
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
10
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
11
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
12
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
13
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
14
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
15
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
16
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
17
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
18
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
19
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
20
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते

लॉकडाऊन, अनलॉकमध्ये खवा विक्रीने शेतकऱ्यांना तारले - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 4:35 AM

परळी : कधी कोरडा दुष्काळ, तर कधी ओला दुष्काळ अशा स्थितीत नेहमी शेतकरी सापडत असताना तालुक्यातील नंदागौळ, अंबलवाडी व ...

परळी : कधी कोरडा दुष्काळ, तर कधी ओला दुष्काळ अशा स्थितीत नेहमी शेतकरी सापडत असताना तालुक्यातील नंदागौळ, अंबलवाडी व अंबाजोगाई तालुक्यातील तेलघणा, लेंडेवाडी येथील शेतकऱ्यांनी मात्र शेतीला जोडधंदा म्हणून खवा उत्पादनाला प्राधान्य दिले आहे. लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये खवा विक्रीने अनेकांना तारले आहे. परळीच्या बाजारपेठेत नंदागौळ, अंबलवाडीच्या खव्याला वाढती मागणी आहे. लॉकडाऊन असतानाही खव्याची शहरात चांगली विक्री करून खवा उत्पादकांनी घरखर्च भागवून मुलांचे शिक्षण व संगोपन केले आहे. लॉकडाऊनमध्ये मात्र खव्याची विक्री गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत घटली होती. आता अनलॉकनंतर पुन्हा खव्याची विक्री वाढू लागली. परळी तालुक्यातील नंदागौळ येथे घरोघरी दूध व खव्याचे उत्पादन केले जाते. येथील शेतकऱ्यांनी जोडव्यवसाय म्हणून दूध, खवा विक्रीचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून स्वीकारला आहे. दुसऱ्या पिढीतही खवा उत्पादन करणे व त्याची विक्री करणे हे चालू आहे. नंदागौळ येथील ८० टक्के शेतकरी खवा निर्मिती करून थेट बाजारात विक्री करतात. नंदागौळ येथून तयार खवा आणून शहरात त्याची विक्री करण्यात येते. अनलॉकनंतर खवा विक्रीत वाढ झाली. शहरातील वैजनाथ मंदिराजवळील रस्त्यावर खवा विक्री केली जाते. त्याशिवाय शहरातील स्वीट होम, हॉटेलमध्ये खव्याचा पुरवठा केला जातो. तसेच अंबलवाडी, तेलघणा येथील शेतकरीही खवा विक्रीवर भर देतात.

सध्या पशुखाद्य महागले आहे; परंतु खव्याचे भाव मात्र २०० रुपये आधी होते तितकेच आहेत. नंदागौळ येथे बचतगटाच्या माध्यमातून मिळालेल्या मशीनमधून खवा तयार करून विक्री केली जाते. चुलीवर व भट्टीवर खव्याचे उत्पादन शेतकरी करतात. शेती करून खवा बनविणे, विक्रीस प्राधान्य दिले. त्यामुळे घरखर्च भागवून मुलांचे शिक्षण करता आले.

- शिवाहार गीते, नंदागौळ, शेतकरी व खवा विक्रेते.

नंदागौळ व तेलघणा येथील खव्यास जिल्ह्यात वाढती मागणी आहे. तो चवीला छान आहे. गुलाबजामून बनविण्यासाठी याचा वापर केला जातो. सणासुदीत येथील खव्यास वाढती मागणी असते. - ज्ञानोबा रामभाऊ गित्ते, खवा उत्पादक.