शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

बाजरी पाण्यात पोहतेय, उडीद वायाला गेला, लय वाटोळं झालं साहेब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:35 AM

कडा : आधी पाऊस नव्हता म्हणून पिकं वायाला गेली. राहिलीसाहिली पाण्यावर केलेली पिके काही कळायच्या आत पावसाने हिरावली. साहेब, ...

कडा : आधी पाऊस नव्हता म्हणून पिकं वायाला गेली. राहिलीसाहिली पाण्यावर केलेली पिके काही कळायच्या आत पावसाने हिरावली. साहेब, आमच्या शेतीचं लय वाटोळं झालं. कांदे वाहून गेले, बाजरी पाण्यात पव्हती, उडीद वायाला गेलाय, आता आगीतून निघून फुपाट्यात पडल्यासारखं झालंय. आम्हाला मदत करा, अशी व्यथा शेडाळा येथील वयोवृद्ध शेतकरी रामभाऊ गोविंद सरतपे यांनी पालकमंत्र्यांसमोर पोटतिडकीने मांडली. आष्टी तालुक्यातील काही महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे गुरूवारी दौरा केला. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.

आष्टी तालुक्यात खरिपाच्या पेरण्या झाल्यानंतर पावसाने अखडते घेतल्याने पाण्याअभावी पिके जळून वाया गेली. काही पिके विहीर, बोअरच्या पाण्यावर जगवली. जेव्हा गरज होती तेव्हा आला नाही आणि आता हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला. अख्खे पीक पाण्यात पव्हतेत, शेतात जाता येईना, रानं उपळली, लावलेले कांदे वाहून गेले, उडदाचे लय नुकसान झालंय. शेतीने थोडी जरी साथ दिली तरी संकट आमच्या मानगुटीवर बसतंय या पावसाने सारं हिरावलंय आता आम्हाला या संकटातून सावरा, अशी विनवणी रामभाऊ गोविंद सरतपे यांनी यावेळी केली.

नुकसान भरपाई मिळवून देतो बाबा काळजी करू नका

वयोवृद्ध आजोबांनी आपल्या शेतीच्या नुकसानीची व्यथा पोटतिडकीने मांडताच पालकमंत्र्यांनी ‘बाबा तुम्ही काळजी करू नका, मी नुकसानीची पाहणी करायला आलोय, तुम्हाला भरपाई मिळवूनच देणार’, या शब्दात खचलेल्या हताश झालेल्या शेतकऱ्याला धीर देत त्याचे मनोबल वाढवल्याचे दिसून आले.

020921\nitin kmble_img-20210902-wa0027_14.jpg