शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

गेवराईत शाळा सुरू करण्यासाठी मनसेचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:37 AM

गेवराई : कोरोनाच्या सबबीखाली तब्बल दोन वर्षांपासून जि.प.च्या शाळा बंद आहेत. श्रीमंत लोकांचे मूल ऑनलाईनच्या माध्यमातून शिकत आहेत. गोरगरिबांच्या ...

गेवराई : कोरोनाच्या सबबीखाली तब्बल दोन वर्षांपासून जि.प.च्या शाळा बंद आहेत. श्रीमंत लोकांचे मूल ऑनलाईनच्या माध्यमातून शिकत आहेत. गोरगरिबांच्या मुलांना मोबाईल घेणं शक्य नसल्याने सरकारने तत्काळ जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू कराव्यात, या मागणीसाठी शनिवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्या नेतृत्वाखाली गटशिक्षण अधिकारी कार्यालयात घंटानाद आंदोलन केले.

एकीकडे शासनाने हॉटेल, बार, मॉल, तसेच इतर सर्व आस्थापना सुरू केल्या आहेत. परंतु, शिक्षण हा मुख्य भाग असूनही ते सुरू करीत नाही. आज जरी ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत असले तरी हे ऑनलाईन शिक्षण मोबाईलअभावी ग्रामीण भागातील व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना घेता येत नाही. यामुळे गरीब व श्रीमंत दरी वाढत असून, विद्यार्थी बालवयात निराशावादी होत आहेत. ही फार गंभीर बाब असून, शासनाच्या वतीने स्वतः पैसे कमाविण्याचा योजना चालू आहेत. यामध्ये गणवेश वाटप, खिचडी वाटप, पुस्तक वाटप या माध्यमातून अनेकजण पैसे कमावत आहेत. आम्ही काळजी घेतो हे भासविण्याचा प्रयत्न आहेत. मात्र, असा दिखाऊपणा बंद करून शाळा सुरू करा नाहीतर गरीब विद्यार्थ्यांसाठी मोबाईल ब्रॉडबँड कनेक्शन, टॅब, कॉम्पुटर सर्व व्यवस्था उपलब्ध करून घ्या, अशी मागणी करीत यावेळी प्रचंड घंटानाद व घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, उपजिल्हाध्यक्ष नीलकंठ वखरे, तालुकाध्यक्ष जयदीप गोल्हार, शेतकरी तालुकाध्यक्ष कृष्णा राठोड, संतोष सावंत, गणेश पवार, रवी मरकड, अशोक बेडके, विकास राऊत, विठ्ठल पट्टे, विशाल देशपांडे, सोपान राठोड, दत्ता जाधव, यदा गाडे, आदी उपस्थित होते.

040921\sakharam shinde_img-20210904-wa0018_14.jpg

गेवराईत शाळा सुरु करण्यासाठी मनसेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.