शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
2
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
3
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
4
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
5
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
6
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
7
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
8
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
10
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
11
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
12
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
13
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
14
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
15
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
17
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
18
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
19
'कासव'गतीनं नऊ हजारी पल्ला गाठणारा भारतीय फलंदाज ठरला किंग कोहली
20
"भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करतंय", PCS परिक्षेवरून प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल

नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 7:27 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज बीडमधील दुष्काळी भागाचा दौरा केला.

Congress Nana Patole ( Marathi News ) : राज्यात सध्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची स्थिती भीषण झाली आहे. मागील वर्षी कमी पाऊस पडल्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आता पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. पाणी नसल्यामुळे शेतातील उभे पिके करपत आहेत, तर जनावरांच्याही चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज बीडमधील दुष्काळी भागाचा दौरा केला. या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन पाहणी केल्यानंतर पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना फोन केला. मात्र या दोघांचेही फोन बंद आल्याने पटोले यांनी नाराजी व्यक्त केली.

दुष्काळाविषयी बोलताना नाना पटोले म्हणाले की, "आम्हाला या विषयाचं राजकारण करायचं नाही. मात्र शेतकऱ्यांच्या वेदना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे कृषीमंत्री तथा बीडचे पालकमंत्री असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, हा आमचा प्रयत्न आहे. यासाठी मी गाडीतून येत असतानाही मुख्यमंत्र्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र त्यांचा फोन बंद आहे. कृषीमंत्र्यांचाही फोन बंद आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती भयावह आहे, बँका कर्ज द्यायला तयार नाहीत, त्यामळे शेतकरी पुन्हा सावकाराच्या दारात जात आहे. बियाणांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या सगळ्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहायला हवं," अशी मागणी पटोलेंनी केली आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विश्रांतीसाठी सातारा येथील आपल्या मूळ गावी गेले होते.' लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला. यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते," असं मुख्यमंत्र्यांनी एक्स अकाऊंटवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी अहिल्यानगर येथील चौंडी या अहिल्यादेवी यांच्या जन्मगावी गेले होते. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNana Patoleनाना पटोलेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसdroughtदुष्काळ