शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
2
प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा
3
भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई; प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा
4
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
5
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
6
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
7
अंबानी कुटुंबाकडून रतन टाटांचे स्मरण; रिलायन्सच्या वार्षिक कार्यक्रमात टाटांना वाहिली श्रद्धांजली
8
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
9
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
10
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
11
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
12
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
13
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
14
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
15
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
16
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
17
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
18
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
19
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
20
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया

रोगप्रतिकार शक्तीसाठी आहाराकडे लक्ष देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:21 AM

तज्ज्ञांचा सल्ला : नियमित योगासनांची आवश्यकता अंबाजोगाई : कोरोनानंतर संपूर्ण जगच बदलून गेले आहे. कोरोना संसर्ग झाला तरी फारसे ...

तज्ज्ञांचा सल्ला : नियमित योगासनांची आवश्यकता

अंबाजोगाई : कोरोनानंतर संपूर्ण जगच बदलून गेले आहे. कोरोना संसर्ग झाला तरी फारसे घाबरण्याचे कारण नसले तरी आजकाल प्रत्येकजण कोरोना होऊच नये, यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविताना आहारात मूग, मटकी आदी कडधान्ये, ताज्या भाज्या, फळे, मांसाहार, दूध, हळदीचा वापर करत आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक आहार आवश्यक आहेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नेमके काय खावे, म्हणजे कोरोनाच होणार नाही, हा प्रश्न सर्वांनाच पडत आहे. मात्र, शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक आहारासोबतच शरीराला दररोज व्यायामाचीही गरज आहे. दररोज दूध, हळद, फळे आहारात असणेही खूप गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ, योगतज्ज्ञ नागरिकांना देत आहेत. कोरोनामुळे अनेकांनी बाहेरील खाद्यपदार्थ खाणे कमी केले आहे. मात्र, एरव्ही अनेक जण फास्ट फूड आवडीने खात होते. आता मात्र एकीकडे कोरोनाची भीती, तर दुसरीकडे आरोग्यावर फास्ट फूडचा होणारा परिणाम, यामुळे सध्या फास्ट फूडवर अघोषित बंदीच असल्याचे चित्र दिसून येत आहे. फास्ट फूडमुळे आरोग्यावरही विपरित परिणाम होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगत आहेत. पिष्टमय, नत्रयुक्त, चरबीयुक्त, क्षार, जीवनसत्त्वे व पाणी हे घटक आहेत. त्यापैकी क्षार व जीवनसत्त्वे आपल्याला ताज्या भाज्यांमधून मिळतात. आपल्या शरीराच्या वाढीसाठी क्षार व जीवनसत्त्वे गरजेची आहेत. अंडी खाणे, दूध पिणे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते. यामुळे आपली हाडे मजबूत होतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. दुधामुळे पचन होण्यास मदत होते. अशी मिळू शकतात जीवनसत्त्वे... प्रथिनांच्या पचनासाठी ‘अ जीवनसत्त्व, कर्बोदकांच्या पचनासाठी ‘ब’ जीवनसत्त्व, तर स्निग्ध पदार्थांच्या पचनासाठी ‘ई’ जीवनसत्त्वाची गरज असते. हाडांच्या बळकटीसाठी ‘ड’ जीवनसत्त्व, रक्तासाठी ‘क’ जीवनसत्त्व आपल्याला आहारातून मिळणे गरजेचे असते. या सर्व जीवनसत्त्वांची गरज आपणास विविध पालेभाज्या आणि कडधान्यांतून भागवता येते.