शहरं
Join us  
Trending Stories
1
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
2
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
3
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
4
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
5
गुरू ग्रहाकवर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
6
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
7
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
8
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
9
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
10
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
11
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
12
केंद्र सरकारची कारवाई; 'हिज्ब-उत-तहरीर' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी
13
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
14
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
15
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
16
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
17
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
18
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
19
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
20
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?

रोगप्रतिकार शक्तीसाठी आहाराकडे लक्ष देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:23 AM

अंबाजोगाई : कोरोनानंतर संपूर्ण जगच बदलून गेले आहे. कोरोना संसर्ग झाला तरी फारसे घाबरण्याचे कारण नसले तरी, आजकाल प्रत्येकजण ...

अंबाजोगाई : कोरोनानंतर संपूर्ण जगच बदलून गेले आहे. कोरोना संसर्ग झाला तरी फारसे घाबरण्याचे कारण नसले तरी, आजकाल प्रत्येकजण कोरोना होऊच नये, यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविताना आहारात मूग, मटकी आदी कडधान्ये, ताज्या भाज्या, फळे, मांसाहार, दूध, हळदीचा वापर करत आहेत.

शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक आहार तर आवश्यक आहेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नेमके काय खावे, म्हणजे कोरोनाच होणार नाही, हा प्रश्न सर्वांनाच पडत आहे; मात्र शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक आहारासोबतच दररोज शरीराला व्यायामाचीही गरज आहे. दररोज दूध, हळद, फळे आहारात असणेही खूप गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ, योगतज्ज्ञ नागरिकांना देत आहेत.

कोरोनामुळे अनेकांनी बाहेरील खाद्यपदार्थ खाणे कमी केले आहेत. मात्र एरव्ही अनेक जण फास्ट फूड आवडीने खात होते. आता मात्र एकीकडे कोरोनाची भीती, तर दुसरीकडे आरोग्यावर फास्ट फूडचा होणारा परिणाम, यामुळे सध्या फास्ट फूडवर अघोषित बंदीच असल्याचे चित्र दिसून येत आहे. फास्ट फूडमुळे आरोग्यावरही विपरित परिणाम होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगत आहेत. पिष्टमय, नत्रयुक्त, चरबीयुक्त, क्षार, जीवनसत्त्वे व पाणी हे घटक आहेत. त्यापैकी क्षार व जीवनसत्त्वे आपल्याला ताज्या भाज्यांमधून मिळतात. आपल्या शरीराच्या वाढीसाठी क्षार व जीवनसत्त्वे गरजेची आहेत. अंडी, दूध पिणे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते. यामुळे आपली हाडे मजबूत होतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. दुधामुळे पचन होण्यास मदत होते.

अशी मिळू शकतात जीवनसत्त्वे...

प्रथिनांच्या पचनासाठी ‘अ जीवनसत्त्व, कर्बोदकांच्या पचनासाठी ‘ब’ जीवनसत्त्व, तर स्निग्ध पदार्थांच्या पचनासाठी ‘ई’ जीवनसत्त्वाची गरज असते. हाडांच्या बळकटीसाठी ‘ड’ जीवनसत्त्व, रक्तासाठी ‘क’ जीवनसत्त्व आपल्याला आहारातून मिळणे गरजेचे असते. या सर्व जीवनसत्त्वांची गरज आपणास विविध पालेभाज्या आणि कडधान्यांतून भागवता येते.