शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

बीड शहरातील बिंदुसरेवरील नवा पूलही धोक्याचा

By admin | Published: June 19, 2017 12:06 AM

बीड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील निजामकालिन पूल कमकुवत झाल्यामुळे पात्रातून केलेला पर्यायी पूल कोसळल्यानंतर सत्ताधारी- विरोधकात पत्रकबाजी, आरोपांच्या फैरी झडत आहेत.

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील निजामकालिन पूल कमकुवत झाल्यामुळे पात्रातून केलेला पर्यायी पूल कोसळल्यानंतर सत्ताधारी- विरोधकात पत्रकबाजी, आरोपांच्या फैरी झडत आहेत. दुसरीकडे शहर व पेठ भागाला जोडणाऱ्या नव्या पुलाच्या दुर्दशेकडे मागील एक वर्षापासून दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे हा पूलही धोक्याचा बनला असून, दुर्घटनेची वाट पाहत बसायचे काय? असा सवाल नागरिकांतून होत आहे. गतवर्षी २ आॅक्टोबर रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे बिंदुसरा नदीला पूर आला होता. डॉ. आंबेडकर चौक, कंकालेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग, जुना मोंढा, बालाजी मंदिर भागाला पुराचा फटका बसला. शेकडो व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. पुरात नवा पूल येथील यशवंतराव चव्हाण उद्यान (चमन) वाहून गेले. परिसरातील पुतळे राहिले मात्र झाडे उन्मळून पडली, तर नव्या पुलाचे सिमेंटचे कठडे तुटून वाहून गेले. चमनलगतचा भाग उघड्यावर पडल्याने वाहतुकीसाठी धोका असल्याचे स्पष्ट दिसत असताना कोणीही या बाबीकडे लक्ष दिले नाही. पूर ओसरल्यानंतर शहराच्या विकासाचा डांगोरा पिटणाऱ्यांसह साऱ्यांनीच मौन बाळगले. आता नऊ महिन्यानंतर पावसाळा सुरू होताच पुन्हा या पुलाचा प्रश्न ऐरणीवर आहे. बिंदुसरेवरेच्या मोठ्या पुलावरील कामाबाबत प्रशासन कार्यवाही करील परंतू नव्या पुलाच्या दुरुस्तीबाबत ठोस निर्णय होईपर्यंत किमान पावसाळा कालावधीत सुरक्षेच्या दृष्टीने नगर पालिकेने व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.