शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
4
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
5
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
6
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
7
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
8
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
9
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
10
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
11
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
12
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
13
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
14
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
15
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
16
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
17
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
18
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
19
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
20
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन

व्यावसायिक सिलिंडरची दरवाढ झाल्याने हॉटेल्स चालकांसमोर नवीन संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:24 AM

भाववाढ करावी तर ग्राहक येईना अंबाजोगाई : कोरोना काळात दीड वर्षांत हॉटेल्स व चहाच्या टपऱ्या जवळपास आठ महिने ...

भाववाढ करावी तर ग्राहक येईना

अंबाजोगाई : कोरोना काळात दीड वर्षांत हॉटेल्स व चहाच्या टपऱ्या जवळपास आठ महिने बंद राहिल्याने आणि कच्चा माल व व्यावसायिक सिलिंडरचे दर तब्बल ४३० रुपयांनी वाढल्याने हॉटेल्सचा व्यवसाय करणाऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे.

गेल्या वर्षीपासून या व्यवसायाची बिघडलेली स्थिती अजूनही सुधारलेली नाही. यावर्षीही मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने बहुतांश दिवस हॉटेल्स व्यवसाय बंद राहिले, तर आता वेळेच्या मर्यादेमुळे ग्राहकांची संख्या घटली आहे. लोक हॉटेल्स आणि स्वीटहोममधील पदार्थांची खरेदी करणे टाळत आहेत. याशिवाय माल तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने हॉटेल व्यवसाय केवळ नावापुरतेच चालवावे लागत आहेत. आता नाश्ता आणि हॉटेलमध्ये जेवण महाग झाले आहे. त्यातच हॉटेलचालकांना लागणाऱ्या व्यावसायिक १९ किलोचे वापरात येणारे गॅस सिलिंडर वर्षभरात ४३० रुपयांनी वाढले आहे. महागाई वाढल्याने कर्मचारी पगारवाढीची मागणी करीत आहेत. याशिवाय विजेचे दर, विविध कर, पाण्यावर होत असलेला खर्च, आदींची वाढ झाली आहे. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर हॉटेल व्यवसाय सुरू आहेत. कधी कधी पदार्थ उरल्यास तोटाही सहन करावा लागतो. सध्या सण नसल्याने मिठाईला मागणी कमीच आहे. या सर्व कारणामुळे हा व्यवसाय चालवावा की नाही, अशी गंभीर समस्या भेडसावू लागली आहे.

भाववाढ केली तर ग्राहक येईना

भाज्या, खाद्यतेल आणि डिझेल वाढल्याने सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. अशा महागाईत मालाच्या किमती वाढविणे हाच एक पर्याय आहे. मात्र, भाववाढ केल्यास ग्राहक येणार नाहीत अशी स्थिती होऊ नये. त्यामुळे पदार्थाच्या किमती वाढविता येत नाहीत.

पार्सल विक्रीही थंडावली

हॉटेल व्यवसाय दुपारी चार वाजता बंद झाल्यानंतर पार्सल विक्रीसाठी मुभा दिली गेली असली तरीही एकदा बाजारपेठ बंद झाल्यानंतर ग्राहकही पार्सलच्या मागणीसाठी फिरकत नाहीत. अनेकांची इच्छा हॉटेलमध्ये बसून खाण्याचीच असते. याचाही मोठा फटका या व्यवसायाला कारणीभूत ठरू लागला आहे.