शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

आता आषाढातही शुभमंगल सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:26 AM

बीड : आषाढात साधारणत: शुभकार्ये टाळली जातात. मात्र कोरोनामुळे यंदा आषाढातही लग्न केली जात आहेत. आषाढ मासात चातुर्मासाचा आरंभ ...

बीड : आषाढात साधारणत: शुभकार्ये टाळली जातात. मात्र कोरोनामुळे यंदा आषाढातही लग्न केली जात आहेत.

आषाढ मासात चातुर्मासाचा आरंभ होतो. या कालावधीत श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक पौर्णिमेपर्यंत निषिद्ध काल आहे. देवशयनी एकादशी ते प्रबोधनी एकादशीपर्यंतचा कालावधी देवांच्या निद्रेचा मानला जातो. त्यामुळे या कालावधीत लग्नकार्य होत नाही. तुलसी विवाहापासून लग्न कार्याला सुरुवात होते. मात्र अलीकडच्या काळात श्रावण, भाद्रपद आणि इतकेच नव्हे तर पक्ष पंधरवड्यातही लोक विवाह सोहळे करू लागले आहेत. कोरोमुळे विस्कळीत झालेली परिस्थिती त्याचबरोबर काम आणि व्यस्ततेमुळे पुरेसा वेळ मिळत नाही. यातच जुळवून ठेवलेली लग्न किती दिवस ठेवायची त्यामुळे लग्न उरकण्यावर भर दिला जात आहे. हे करताना मुहूर्ताकडे दुर्लक्ष करून गौण मुहूर्त, पर्यायी मुहूर्त अशी पळवाट शोधत आषाढातही शुभमंगल धुमधडाक्यात केले जात आहे.

आषाढात शुभ तारखा - चातुर्मासात लग्नकार्य निषिद्धच

धर्मबंधन न पाळण्याची नास्तिक वृत्ती वाढत आहे. स्वैर आचरणाला कोण रोखू शकतो? अत्यावश्यक बाबींमध्ये शास्त्री आषाढात परवानगी देऊ शकतात. अत्यंत अडचणी असतील तरच अशा प्रसंगी निषिद्ध कालातील किंवा गौण काळातील मुहूर्ताचाही पंचांगकर्त्यांनी विचार केलेला आहे. - एकनाथ पुजारी, बीड.

-------

आषाढापासून चातुर्मासाचा कालावधी विवाहासाठी निषिद्ध मानला गेला आहे. प्राचीन पंचांगामध्ये या तिथी नव्हत्या. आषाढ शुद्ध नवमी पर्यंत कठीण प्रसंगी काही मुहूर्त ग्राह्य धरले जातात. लग्नासाठी त्याचा आधार घेतला जातो. मात्र चातुर्मासात होणाऱ्या विवाहांना शास्त्राधार नाही. चातुर्मासात न करता तुलसी विवाहानंतरच लग्न कार्य करायला हवे. - संतोष मुळे, बीड.

-----

मंगल कार्यालये बुक

चातुर्मासत २२, २५, २६, २८, २९ जुलै असे गौण मुहूर्त आहेत. पंचागाला मानणारे चातुर्मासात लग्नकार्य करत नाहीत. परंतु बदलत्या परिस्थितीत विविध पद्धतीने पर्यायी मुहूर्त काढून लग्नसोहळे केले जात आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हौशी आयोजक विवाहासाठी मंगल कार्यालय, केटरिंग, बँड बुकिंग करत आहेत. तुरळक तारखा असल्याने व पावसाळ्यात अडचणी नकोत म्हणून बहुतांश मंगल कार्यालयेदेखील या कालावधीत आरक्षित आहेत.

---------

परवानगी ५० चीच, पण...

विवाह सोहळ्यासाठी प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. पन्नास लोकांना परवानगी आहे. विवाह आयोजन करताना विविध अटी प्रशासनाने ठरवून दिल्या आहेत. या अटींचे पालन करून विवाह करणे आवश्यक आहे. मात्र पन्नासऐवजी १० ते २० पट गर्दी जमवून विवाह सोहळे होत आहेत. काही ठिकाणी होणाऱ्या विवाहांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष तर काही ठिकाणी प्रशासनाकडून कारवायाही झाल्या आहेत.