शहरं
Join us  
Trending Stories
1
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
2
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
3
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
4
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
6
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
7
इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 
8
गरब्याची रंगत वाढणार! मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस लाऊडस्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी
9
सोन्याची किंमत होती 99 रुपये तोळा, 77000 रुपयांपर्यंत कशी पोहोचली?
10
लक्ष्यभेद करणारा डोळा अन् चक्रव्यूह! 'बिग बॉस मराठी'ची चमचमती ट्रॉफी, टॉप ६ सदस्य पाहतच राहिले
11
इस्राइलविरोधात मुस्लिम समुदाय आक्रमक, देशातील अनेक भागात निदर्शने, नसरल्लाहचा शहीद म्हणून केला उल्लेख 
12
"'ते' एक वाक्य अन् तुम्ही माझ्या करिअरचं वाटोळं केलं"; पंकजा मुंडेंनी हसत हसत हातच जोडले
13
आजोबांनी नातीसाठी फुगा आणला पण तोच जीवावर बेतला; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
14
"इस्रायलला इशारा, अरब मुस्लिमांकडे मागितली साथ...; खामेनेईंच्या भाषणातील हे 10 मुद्दे आहेत खास
15
चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंचा पगार रखडला; आता PCB ने केली सारवासारव
16
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
17
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
18
“चारवेळा CM असताना शरद पवारांना आरक्षणाचा मुद्दा का आठवला नाही”; शिंदे गटातील नेत्याचा सवाल
19
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
20
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?

आता रक्त पिशव्यांचा तुटवडा; कसा होणार डेंग्यू रुग्णांवर उपचार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:37 AM

अविनाश मुडेगावकर/ लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कोरोनामुळे ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्याने आधीच अडचणीत आलेल्या शासकीय रक्तपेढ्यांना आता ...

अविनाश मुडेगावकर/

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : कोरोनामुळे ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्याने आधीच अडचणीत आलेल्या शासकीय रक्तपेढ्यांना आता रक्त पिशव्यांच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागत आहे. सध्या डेंग्यूमुळे व दैनंदिन शस्त्रक्रियांमुळे रक्तपेढीत दररोज २० ते २५ बॅगांची मागणी होत आहे. याशिवाय प्लेटलेट्सची मागणीही वाढली आहे. मात्र, बॅगांचीच कमतरता जाणवत असल्याने प्लेटलेट्स द्यायच्या कशा? असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील रुग्ण अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी येतात. सध्या विविध ठिकाणी डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. या आजारावर अँटिबायोटिक किंवा अँटिव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. डेंग्यूच्या गंभीर रुग्णांमध्ये शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याचा धोका असतो. जेव्हा प्लेटलेट्स काउंट १५ हजार प्रतिमायक्रोलिटरपेक्षाखाली येतात तेव्हा त्याला लो प्लेटलेट्स’मानले जाते. अशावेळी रुग्णाला रँडम डोनर प्लेटलेट्स किंवा सिंगल डोनर प्लेटलेट्स दिले जाते; परंतु कोरोनामुळे रक्तदानाची मोहीम थंडावल्याने प्लेटलेट्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी प्लेटलेट्ससाठी सामान्य रुग्णांच्या नातेवाइकांना लातूर येथील खाजगी रक्तपेढीमधून चढ्या दरात पदरमोड करून खासगी रक्तपेढीतून प्लेटलेट्स आणण्याची वेळ आली आहे.

...

ट्रिपल बॅगच्या मागणीत वाढ

एका रक्तदात्याचा रक्तातून लाल पेशी, प्लेटलेट्स, प्लाझ्मा अशा तीन घटकांना वेगळे करता येते. यासाठी ट्रिपल बॅगची गरज पडते. सूत्रानुसार कोरोनामुळे या बॅगच्या उत्पादनावर प्रभाव पडला आहे. कोरोना कमी होताच रक्त व रक्त घटकांच्या मागणीत वाढ झाली आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठादारांकडून कमी पुरवठा होत असल्याची माहिती आहे.

...

मागणीप्रमाणे पुरवठा बंद

स्वाराती शासकीय रुग्णालयांच्या रक्तपेढीत कोरोनापूर्वी रक्तदात्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्याने रक्ताचा तुटवडा जाणवत नव्हता. सातत्याने रक्तदान शिबिर सुरूच असते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व लसीकरण यामुळे रक्तदात्यांची संख्या कमी झाली आहे. रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान करण्यासाठी जनजागृती सुरू आहे. रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे आले तर निश्चितच तुटवडा कमी होऊन गरजू रुग्णांना रक्तपुरवठा होईल.

-डॉ. शीला गायकवाड, रक्तपेढी, अंबाजोगाई.