शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

अतिवृष्टीत केवळ २५६ गावे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:35 AM

बीड : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. याचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी ...

बीड : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. याचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी व महसूल विभागाला दिले होते. यात केवळ २५६ गावांत नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. यात सहा तालुक्यातील एकाही गावात नुकसान झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नुकसानीत गेवराई तालुक्यातील १८३ व बीड तालुक्यातील ५३ गावांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. यामध्ये गेवराई तालुक्यातील १८३, बीडमधील ५३ तर आष्टी तालुक्यातील सहा, वडवणी ११ व धारूर तालुक्यातील एका गावात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. तर, परळी, केज, अंबाजोगाई, माजलगाव, शिरूर, आष्टी, पाटोदा या तालुक्यात एकाही गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. हा प्राथमिक अंदाज असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुन्हा महसूल व कृषी विभाग संयुक्त जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

एक लाख २५ हजार ९० शेतकऱ्यांचे नुकसान

कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात २५६ गावांमधील एक लाख २५ हजार ९० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर ९४ हजार हेक्टरवरील पिकांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामध्ये सर्व क्षेत्र हे जिरायती असून, १५८५ हेक्टरील फळबागांचे नुकसान झाले झाल्याचे अहवालात नमूद आहे.